औरंगाबाद शहरात राबवली होती व्यापक अतिक्रमण मोहीम.
मुख्याधिकारी सपना वसावे यांनी औरंगाबाद महापालिकेत सहायक उपयुक्त पदावर नियुक्त झाल्या बरोबर शहरात व्यापक प्रमाणात वाढलेले अतिक्रमण काढले होते. दाटीवाटीने अतिक्रमण केलेले असे २३ रस्ते त्यांनी मोकळे केले होते. त्यानंतर धरणगाव नगरपालिकेतसुध्दा त्यांनी अतिक्रमण मोहीम राबवून शहरातील मुख्य रस्ते मोकळे केले आहेत. अतिक्रमण मोहिमेमुळे या दोन्ही शहरांनी मोकळा श्वास घेतला होता.
विकास कामांचीही शहरात घोडदौड
तळोदा शहराने सध्या कात टाकली आहे. कारण शहादा रस्ता, हातोडा रस्ता व चिनोदा रस्ता या प्रमुख तीन रस्त्यांचे पालिकेने डिव्हायडरची कामे हाती घेतली आहेत. येथे सोलर पथदिवेदेखील बसवले आहेत. साहजिकच यामुळे तळोदा शहरात झगमगाट झाला आहे. शिवाय शहराच्या सौंदर्यात भरसुध्दा पडली आहे. अर्थात यासाठी पालिकेच्या सर्व पदाधिकारी व विरोधी नगरसेवकांचे मोठे सहकार्य लाभत असल्याचे ते सांगतात.