शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

ग्रामीण भागात बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST

नंदुरबार : पाचवी ते बारावीच्या शाळ सुरू झाल्या, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील शाळांमध्ये येण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध ...

नंदुरबार : पाचवी ते बारावीच्या शाळ सुरू झाल्या, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील शाळांमध्ये येण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शैक्षणिक नुकसानदेखील होत असून ग्रामीण भागातील बस फेऱ्यांसह मानव विकास मिशनच्या बसेसही सुरू करण्याची मागणी होत आहे.

नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहेत, तर पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे. परंतु ग्रामीण भागात एसटी बसेससह मानव विकास मिशनच्या बसेस देखील सुरू नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आधीच कोरोनामुळे रोजगार बुडालेल्या सर्वसामान्य कुटुंबांना दररोज भाडे खर्च करून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे शक्य नाही. काही भागात बससेवा सुरू झाली असली तरी शाळेच्या वेळेत फेऱ्या नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे वेळापत्र पूर्वीप्रमाणे अर्थात लॅाकडाऊनच्या आधी होते त्या प्रमाणे सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

अनेक मार्गांवर एकही फेरी नाही...

n जिल्ह्यातील अनेक मार्गांवर एसटीची एकही फेरी नसल्याचे दिसून येते. ज्या मार्गावर उत्पन्न मिळू शकेल अशाच मार्गावर फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. अशा भागात विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. खासगीवाहनेदेखील शाळेच्या वेळेत राहत नसल्याने विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत आहे.

शाळेच्या वेळेनुसार होते आधी एसटीचे वेळापत्रक...

n लॅाकडाऊनच्या आधी शाळांच्या वेळेप्रमाणे एसटीचे ग्रामीण भागातील वेळापत्रक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते सोयीचे ठरत होते. लॅाकडाऊननंतर मात्र बस बंद झाल्या. नंतर सुरू झाल्या तर वेळापत्रक बदलण्यात आले. त्यामुळे अनेक मार्गांवर दिवसातून एक किंवा दोनच फेऱ्या होतात.

n विद्यार्थिनींसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसेस देखील सुरू केलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना सवलत पासची सोय करण्यात आली असली तरी वेळेवर बसेस नसल्यामुळे त्या पासचाही उपयोग होत नसल्याची स्थिती आहे.