शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

गावाची तहान भागविण्यासाठी ‘त्यांनी’ काढले व्याजाने पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 13:08 IST

टंचाईग्रस्त उमर्देखुर्द गावातील कथा : गरज भासल्यास उदरनिर्वाहासाठी असलेला टेम्पो विकण्याचीही तयारी

रमाकांत पाटील । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : माणूस श्रीमंत असो वा गरिब पण गावाबद्दल ऋण फेडण्याची जेंव्हा जिद्द मनात पेटते तेंव्हा तो काहीही करू शकतो. याचे उदाहरण उमर्दे खुर्द ता.नंदुरबार येथील देता येईल. या गावातील पाच तरुणांनी गावाची तहान भागविण्यासाठी चक्क व्याजाने पैसे घेवून तलाव खोलीकरणाची कामे सुरू केली आहे. उर्वरित मदत लोकवर्गणीतून न मिळाल्यास रोजगारासाठी असलेला टेम्पो व रिक्षाही विकण्याची तयारी या युवकांनी दर्शविली आहे. नंदुरबार शहरापासून जेमतेम पाच किलोमिटर अंतरावर उमर्दे खुर्द हे सुमारे अडीच हजार लोकवस्तीचे गाव. या गावाला पाण्याचा जणू शापच मिळाला आहे. गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने ग्रामस्थांना रोज चार, पाच किलोमिटर भटकंती करून पाणी आणावे लागते. या गावासाठी शासनाने वासदरा धरणातून यापूर्वी योजना दिली होती. मात्र ती योजना बंद पडल्याने गेल्या काही वर्षापासून गावापासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या वडगाव येथील विहिरीतून पाणी पुरवठा सुरू केला. परंतु ती विहिरही कोरडी झाल्याने गावात गेल्या तीन वर्षापासून तीव्र पाणी टंचाई आहे. या गावाला पावसाळ्यातील तीन महिने पाण्यासाठी आराम असतो. पण उर्वरित नऊ महिने रोज कुठे ना कुठे पाण्याचा शोध घेण्यासाठी फिरावे लागते. सध्या गावात 50 ते 100 रुपयात बैलगाडीवर पाण्याचे पिंप भरून आणून देण्याचा व्यवसायही सुरू आहे. या गावाची वॉटर कप स्पर्धेसाठी निवड झाली असून गावातील कमलेश मधुकर चौधरी, मल्हारी खंडू पाटील, आनंदराव राजाराम मराठे, नंदु शिवदास कोतकर आणि अजय भिका ठाकरे या पाच तरुणांनी पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेतले. या पाच जणांपैकी दोन जण रिक्षा व टेम्पो चालवून उदरनिर्वाह करतात. तर उर्वरित तिघे भुमीहिन व अल्पभूधारक शेतकरी आहेत. प्रशिक्षणाला गेल्यानंतर तेथे जे मार्गदर्शन मिळाले त्यातून या तरुणांना गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली. विशेषत: पाण्यासंदर्भातील विषय असल्याने व गावात भिषण पाणीटंचाई असल्याने गावाची तहाण भागविण्यासाठी श्रमदानाबरोबरच वाटेल ते करण्याची त्यांची जिद्द पेटली. गावात आल्यानंतर तांत्रिक सल्लागाराचा सल्ला घेतला. त्यानुसार गावाचा उतार उलटय़ा दिशेने असल्याने या ठिकाणी सीसीटी अथवा इतर कामे जी श्रमदानातून करणे शक्य आहे ती जास्त कामे नव्हती. त्यामुळे गावातील तिन्ही तलावांचा गाळ काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गावालगतच हे तलाव असून 1972 च्या दुष्काळात ते तयार करण्यात आले होते. या तलावाचे खोलीकरण करण्यासाठी भारतीय जैन संघटनेकडून जेसीबी विनामुल्य मिळाले पण त्यासाठी लागणारे डिङोल खरेदीसाठी मात्र पैशांची आवश्यकता होती. त्याकरीता त्यांनी गावात मदत फेरी काढली. पण त्यातही जेमतेम सात हजार रुपये जमा झाले. एका दानशुर व्यक्तीने दहा हजार दिले. या पैशातून डिङोलचा खर्च भागविणे शक्य नसल्याने आणि कामही होणे आवश्यक असल्याने या पाचही तरुणांनी स्वत:चा जिम्मेदारीवर एक लाख रुपये व्याजाने घेतले आहेत. त्या रक्कमतेतून तलावाचे खोलीकरणाचे काम सुरू आहे. गावातील एका तलावातील साधारणत: 44 हजार घनमिटर काम पुर्ण झाले आहे. तर दुस:या तलावाचे जवळपास एक लाख घनमिटरचे काम असून ते सुरू आहे. या कामांसाठी जवळपास 200 तास पेक्षा अधीक काळ जेसीबी मशीन वापरावे लागणार आहे. त्यासाठी जवळपास दोन लाख 20 हजार ते अडीच लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे. गावात मदतीसाठी हे तरुण ग्रामस्थांकडे जात आहेत परंतु अपेक्षीत प्रतिसाद मिळत नाही. काही महिलांनी मदत दिली पण ती रक्कमही कमी आहे. त्यामुळे पुढील काम कसे करावे हा प्रश्न या तरुणांसमोर आहे. त्यासाठी मल्हार पाटील व कमलेश चौधरी यांनी आपल्याकडे असलेला टेम्पो आणि रिक्षा विक्री करण्याचा विचार सुरू केला आहे. एकुणच गावातील या तलावांचे खोलीकरण झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात त्यात पाणी साठेल व गावाचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल असा विश्वास या तरुणांना आहे. याशिवाय वॉटर कप स्पर्धेतही गावाला बक्षिस मिळविण्याची जिद्द व त्यासोबतच गावातील पाणी प्रश्न सोडविण्याची तळमळ त्यांची आहे. त्यांच्या या जिद्दीला आता लोकांचे पाठबळ मिळण्याची गरज आहे.