शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

११ वाजण्याच्या वेळ मर्यादेमुळे व्यावसायिकांची झाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST

नंदुरबार : किराणा, भाजीपाला, फळ विक्रीसह इतर दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांसह व्यावसायिकांचीही मोठी ...

नंदुरबार : किराणा, भाजीपाला, फळ विक्रीसह इतर दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांसह व्यावसायिकांचीही मोठी धावपळ झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. काही ठिकाणी पोलिसांना दंडुकाही उगारावा लागल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात १ तारखेपासून संचारबंदी लागू आहे. राज्य शासनाने १५ तारखेपासून संपूर्ण संचारबंदी लागू केली. या कालावधीत आतापर्यंत सकाळी आठ ते दुपारी १ वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला, फळ विक्रीसह इतर दुकाने सुरू ठेवण्याची मुभा होती. परंतु, बुधवारपासून नवीन आदेशाप्रमाणे सकाळी ११ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याची मुभा आहे. बुधवारी सकाळी अनेक लहान व्यावसायिकांना, फेरीवाल्यांना त्याची माहिती नव्हती. त्यामुळे सकाळी ११ वाजता पोलिसांचे वाहन तसेच पालिका कर्मचारी रस्त्यावर उतरताच व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली. एवढ्या लवकर दुकाने बंद करावी लागत असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी नेहमीप्रमाणे साडेनऊ, दहा वाजता दुकाने सुरू केली. मात्र, एक ते दीड तासातच बंद करावी लागल्याने त्यांचा व्यवसाय झाला नाही. पोलिसांनी पहिला दिवस असल्याने व्यावसायिकांना दुकान बंद करण्यास काही वेळ दिला. त्यामुळे सव्वा अकरापर्यंत मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट झाला. काही ठिकाणी त्यानंतरही हातगाडीवाले, फेरीवाले दिसून आल्याने पोलिसांना दंडुका उगारावा लागल्याचेही चित्र होते.