शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वाढत्या तापमानामुळे नंदुरबारातील जनजीवनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:16 IST

असह्य ऊन व उकाडय़ाने हैराण

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 28 : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद मंगळवार, 27 मार्च रोजी करण्यात आली. मंगळवारचे कमाल तापमान 40.2 तर किमान 21.3 सेल्सीयस नोंदले गेले. वाढत्या तापमानामुळे जनजिवनावर परिणाम झाला आहे. मंगळवारी बाजाराचा दिवस असूनही बाजारात दुपारी फारशी गर्दी दिसून आली नाही.गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानाचा पारा वाढतच आहे. गेल्या दोन दिवसात दीड ते दोन सेल्सीयस तापमानाची वाढ झाली आहे. सरासरी तापमाना 38 ते 39 अंशार्पयत कायम होते. मंगळवारी मात्र तापमान थेट 40 च्यावर गेले. दुपारी दोन वाजता तापमानाची नोंद 40.2 इतकी नोंदली गेली. यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वोच्च नोंद असल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे. प्रशासनासह जिल्ह्यातील दोन्ही कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्रात देखील तापमानाचा आकडा 40 नोंदला गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शासकीय तापमानाची आकडेवारी आपत्ती निवारण केंद्रातर्फे घेतली जाते. याशिवाय नंदुरबारातील हवामानाचे उपकरण थेट उपग्रहाने पुणे वेधशाळेशी देखील जोडले गेले आहेत. त्यांच्या आकडेवारीत देखील 40 हा आकडा नोंदला गेला आहे.जनजिवनावर परिणामवाढत्या तापमानामुळे जनजिवनावर देखील परिणाम होत आहे. विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ताप, डोकेदुखी, अंगदुखी या आजारांच्या रुग्णांमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाढ झाली असल्याचे जिल्हा रुग्णालय आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी स्पष्ट केले. त्यामुळे उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.उष्माघात कक्षाची संकल्पना कालबाह्यजिल्हा रुग्णालयांमधील उष्माघात कक्षांची संकल्पना कालबाह्य झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील जवळपास सर्वच महत्वाचे वॉर्ड हे वातानुकुलीत करण्यात आलेले आहेत. त्यामुळे वेगळ्या अशा कक्षाची गरज नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये यांनी स्पष्ट केले. असे असले तरी उपजिल्हा रुग्णालये, ग्रामिण रुग्णालये या ठिकाणी असे कक्ष सज्ज ठेवण्याच्या सुचना याआधीच देण्यात आलेल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, वाढत्या तापमानामुळे गारवा देणा:या पदार्थाना देखील मागणी वाढली आहे. रसदार फळांना मोठी मागणी आहे.