शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

विरोधामुळे अध्यक्षांनी सभागृहच सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सत्ताधारी काँग्रेस त्यांच्याच सदस्यांच्या गटात कामे मंजुर करतात यासह इतर विषयांवरून भाजपने काँग्रेसला चांगलेच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सत्ताधारी काँग्रेस त्यांच्याच सदस्यांच्या गटात कामे मंजुर करतात यासह इतर विषयांवरून भाजपने काँग्रेसला चांगलेच अडचणीत आणले. आक्रमक झालेल्या भाजपमुळे अखेर अध्यक्षा सीमा गावीत यांना अर्ध्यातूनच सभा सोडून जावे लागले. त्यांच्या मागोमाग काँग्रेस सदस्यही निघून गेले. परंतु भाजप सदस्य सभागृहात बसून होते. प्रतिसभा घ्यावी अशी मागणी त्यांनी लावून धरली. परंतु ती नामंजूर करण्यात आली. दरम्यान, काँग्रेसचे १६ तर भाजपचे २४ सदस्य उपस्थित होते. शिवसेनेचे केवळ उपाध्यक्ष उपस्थित होते.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा सीमा गावीत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. सभेत आज सत्ताधारी काँग्रेसचे अवघे १६ सदस्य उपस्थित होते. तर भाजपचे २४ सदस्य उपस्थित होते. त्यामुळे भाजपने ही संधी साधत काँग्रेसला चांगलेच कोंडीत पकडले. गेल्या काही दिवसात विविध कामे मंजुरीवरून ही धूसफूस सुरूच होती. नंदुरबार व नवापूर तालुक्याला विकास कामांपासून ढावलले जात असल्याची सूप्त नाराजी होतीच ती आजच्या सभेतून बाहेर निघाली.भाजप आक्रमक...सुरुवातीचा विषय सदस्यांच्या रजेचा अर्जाच होता. शिवसेनेचे सहा आणि काँग्रेसच्या पाच सदस्यांच्या रजेचा अर्ज मंजुर करण्यात आला. त्यानंतर इतिवृत्त आणि मागील सभेत केलेल्या ठरावांचा आढावा सादर करण्याचा विषय येताच तो नामंजूर करावा यासाठी मतदान घ्यावे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. यावर अध्यक्षांनी मतदान घेण्याची गरज नाही. तुमचा विरोध नोंदवून घेतो असे सांगून पुढचा विषय घेण्याचे सुचविले. त्यावर विरोधकांमधून भरत गावीत, अर्चना गावीत, धनराज पाटील हे आक्रमक झाले. कोरोनाचे आणि सदस्यांच्या रजा मंजुरीचे विषय वगळता इतर सर्व विषयांवर मतदान घेवूनच ते मंजुर करावे अशी मागणी करण्यात आली. यासाठी भाजपचे सदस्य आक्रमक झाले. डायसपुढील मोकळ्या जागेत देखील सदस्य येवू लागले. दुसरीकडे काँग्रेसकडून आक्रमक कुणीच नव्हते. केवळ सभापती अभिजीत पाटील आणि सदस्य सुहास नाईक यांनी किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपच्या आक्रमक सदस्यांपुढे उपयोग झाला नाही.अध्यक्षांचा काढता पाय...सभेतील वाढता विरोध पहाता सभेचे कामकाज चालू शकणार नाही हे पहाता अध्यक्षा सीमा वळवी यांनी सभेतून काढता पाय घेतला. त्या बाहेर निघताच काँग्रेसचे सभापती आणि सदस्य यांनीही सभागृह सोडले. उपाध्यक्ष तथा शिवसनेचे सदस्य अ‍ॅड.राम रघुवंशी यांनीही थोड्या वेळात आपल्या चेंबरमध्ये जाणे पसंत केले. अधिकारीही नंतर सभागृहातून बाहेर निघाले.दुसरीकडे भाजपचे सदस्य सभागृहात ठाण मांडून होते. सभा सुरू करा अशी मागणी त्यांनी लावून धरली.प्रती सभा घेण्याची मागणीअध्यक्षा व पदाधिकारी जर सभागृहात येत नसतील तर भाजपच्या उपस्थितीत सदस्यांमधून ज्येष्ठ सदस्याची अध्यक्षपदी निवड करून प्रती सभा घेवून चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे यांची त्यांनी भेट घेतली. परंतु तसे होऊ शकत नाही अशी समजूत या दोन्ही अधिकाऱ्यांनी घातली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता भाजपचे सदस्य जिल्हा परिषदेबाहेर निघाले.विषय नामंजुरचे निवेदनसभागृहात भाजप सदस्यांची संख्या अधीक असल्याने विषयांना विरोध पहाता ते विषय नामंजूर करावे अशी मागणी करण्यात आली. त्यात मागील सभेचे इतिवृत्त नामंजूर करावे. २०२०-२१ चे अंदाजपत्रक नामंजूर करावे, मागील सभेतील ठरावांवरील पुर्ततेचा आढावा यासह इतर विषयांचा समावेश आहे. केवळ कोवीड योद्धयांना विमा संरक्षण कवच आणि कर्मचारी विमा व सदस्यांचे रजा मंजुरीचे अर्ज हे विषय मंजूर करून इतर सर्व अर्थात २३ विषय नामंजूर करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सत्ताधारी व विशेषत: अध्यक्षांची सभा चालविण्याची पद्धत लोकशाहीला धरून नाही. विरोधकांच्या मतांचाही सन्मान राखला जावा अशी अपेक्षाही या निवेदनात नमुद करण्यात आली आहे.झूप अ‍ॅपनेही सोयज्या सदस्यांना बैठकीत येणे शक्य नसेल त्यांच्यासाठी त्या त्या पंचायत समिती स्तरावर झूप अ‍ॅपद्वारे बैठकीत सहभागी होता येईल अशी सोय करण्यात आली होती. परंतु त्याचा उपयोग एकाही सदस्याने घेतला नसल्याचे चित्र होते.जिल्हा परिषदेत कामे वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून प्रचंड धूसफूस सुरू आहे. नंदुरबार व नवापूर तालुक्यातील भाजप, शिवसेनेच्या सदस्यांना ढावलले जात आहे. यामुळे सदस्यांमध्ये नाराजी होती. त्याच पार्श्वभुमीवर आजचा आक्रमक पवित्रा घेतला गेल्याचे एकुणच चित्र होते. वास्तविक सत्तेत तिन्ही पक्ष वाटेकरी असतांनाही दुजाभाव केला जात आहे. जिल्हा परिषद चालविण्याची ही कुठली पद्धत आहे असा प्रश्न भाजप सदस्यांनी उपस्थित केला.जिल्हा परिषदेत काँग्रेस मनमानी कारभार करीत आहे. ठराविक तालुक्यांना व सदस्यांना झुकते माप दिले जात आहे. सत्तेच्या बळावर काम पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. आज सत्ताधारी पदाधिकारी व सदस्यांनी केलेली वर्तवणूक लोकशाहीला धरून नाही. त्यामुळेच आम्ही प्रती सभागृह चालविण्याची मागणी केली होती. तीन विषय वगळता इतर सर्व विषयांना आमचा विरोध राहणार आहे.-भरत गावीत, ज्येष्ठ सदस्य, भाजप.