शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोषक वातावरण निर्माण झाल्याने भात लागवडीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भात लागवडीला पोषक वातावरण निर्माण होऊन लागवड क्षेत्र दुपटीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भात लागवडीला पोषक वातावरण निर्माण होऊन लागवड क्षेत्र दुपटीने वाढले आह़े नवापुर आणि नंदुरबार तालुक्यात भात लागवडीच्या क्षेत्रात यंदा वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आह़े       जिल्ह्यात सर्वसाधारण 20 हजार 895 हेक्टर क्षेत्रात भात लागवड निर्धारित करण्यात येत़े गत दोन वर्षात ही लागवड 60 टक्क्यांपेक्षा कमीच होती़ गेल्या वर्षी दुष्काळ असल्याने भात लागवड निम्म्यावर आली होती़ यातून तांदूळ उत्पादन घसरले होत़े यंदा पावसाने जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर भात उत्पादक शेतक:यांना दिलासा मिळाला होता़ ऑगस्टर्पयत पाऊस टिकून असल्याने भातशेतीसाठी शेतक:यांनी तयारी पूर्ण केली असून नवापुर तालुक्यात भात लावणी वेगाने सुरु आह़े नवापुरनंतर नंदुरबार आणि अक्कलकुवा तालुक्यात भात लावणी करण्यात येत असल्याचे दिसून आले आह़े जिल्ह्यात यंदा 20 हजार हेक्टरपेक्षा अधिक भात लावणी होणार असल्याचा अंदाज असून यातून विक्रमी उत्पादन येऊन गत पाच वर्षात शेतक:यांना झालेल्या नुकसानीची भरपाई होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आह़े आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात निर्धारित क्षेत्राच्या  15़19, नवापुर 79, अक्कलकुवा 70, धडगाव 85 तर तळोदा तालुक्यात 33 टक्के भात लावणी पूर्ण करण्यात आली आह़े जिल्ह्यात खरीप हंगामात तृणधान्य पिकात ज्वारी आणि भाताचा समावेश आह़े उर्वरित तृणधान्य पिके नगण्य क्षेत्रात केली जातात़ दुष्काळामुळे भाताचे लागवड क्षेत्र घटल्याने शेतक:यांच्या वार्षिक उत्पादनावर गत दोन वर्षात परिणाम झाला होता़ 

जिल्ह्यात आतार्पयत एकूण 15 हजार 291 हेक्टर भाताची क्षेत्रात लागवड पूर्ण करण्यात आली आह़े यात सर्वाधिक 10 हजार 963 हेक्टर भात लागवड नवापुर तालुक्यात पूर्ण झाली आह़े अद्याप तेथे लागवड सुरु असल्याने आकडा वाढणार असल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबार 142, अक्कलकुवा 354, धडगाव, 42 तर तळोदा तालुक्यात 226 हेक्टरवर भात लागवड करण्यात आली आह़े जिल्ह्यात 2018-19 या वर्षात केवळ 10 हजार हेक्टर्पयत भात लागवड पूर्ण झाली होती़ यात नवापुर तालुक्यात पाच हजार हेक्टर्पयतच लागवड होऊ शकली होती़ यंदा मात्र नवापुर तालुक्यात पावसाने जोर दिल्याने लागवड दुपटीने वाढली आह़े नंदुरबार व अक्कलकुवा तालुक्यात यंदा भात लागवड किमान 700 ते हजार हेक्टर्पयत जाण्याची चिन्हे असल्याचे कृषीतंज्ञांकडून सांगण्यात येत आह़े 

जिल्ह्यात सरासरी 1 हजार 3 हेक्टर प्रतिकिलो ग्रॅम तांदूळ उत्पादन घेतले जात़े 2015 च्या खरीप हंगामातून हेक्टरी 920 किलोग्रॅम भाताचे उत्पादन घेण्यात आल़े 173 मेट्रीक टन उत्पादन जिल्ह्याच्या वाटय़ाला आले होत़े 2016 मध्ये प्रती हेक्टर 1 हजार 162 किलो तर 294 मेट्रीक टन, 2017 च्या हंगामात प्रती हेक्टर 1 हजार 131 तर 2018 च्या खरीप हंगामात केवळ 711 किलो ग्रॅम प्रती हेक्टर उत्पादन आले आह़े गेल्या वर्षात 166 मेट्रीकटन भाताचे उत्पादन घेतले गेले होत़े