शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

शासनाचा अध्यादेश कृषी विभागाने समजून न घेतल्याने शेतक:यांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतीमाल विक्रीसाठी शासनाने बाजार समित्या सुरू करण्याचा अध्यादेश काढला असला तरी हा अध्यादेश कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतीमाल विक्रीसाठी शासनाने बाजार समित्या सुरू करण्याचा अध्यादेश काढला असला तरी हा अध्यादेश कृषी विभागाने समजून न घेतल्याने जिल्ह्यातील शेतक:यांचे माल विक्रीसाठी संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या शेतक:यांच्या घरात धान्य पडून आहे. लॉकडाऊन मुळे बंधने आल्यामुळे त्यातून मार्ग काढत शासनाने बाजार समित्यांना धान्य खरेदी संदर्भात अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार शेतक:यांनी ज्यांना धान्य विक्री करायची असेल त्यांनी तालुका कृषी अधिका:याकडे नोंद करावी व कृषी अधिकारी बाजार समितीतील गर्दी नियंत्रणात       राहावी यासाठी टोकण देतील अशा सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शेतकरी तालुका कृषी अधिका:यांकडे माल विक्रीसाठी नोंद करीत असले तरी कृषी विभागाकडून मात्र शेतक:यांना बाजार समितीच्या निवडीबाबत बंधने आणली   जाताहेत. शेतक:यांची नोंदणी करतांना कृषी अधिकारी त्या त्या तालुक्याच्या ठिकाणच्याच बाजार समितींना माल विक्रीची सक्ती करीत आहेत. वास्तविक नंदुरबार बाजार समिती ही राज्यात सर्वदूर प्रसिद्ध  आहे. जिल्ह्यातील शेतकरी तेथे दरवर्षी धान्य विक्री करीत आहेत. तर शहादा बाजार समिती देखील हरभरा खरेदीसाठी सर्वदूर परिचित आहे. त्यामुळे शेतक:यांना हरभरा विक्री करायची असेल तर ते शहादा बाजार समितीत विक्री करतात. तर गहू विक्री करायची असेल तर नंदुरबार बाजार समितीत आणतात. परंतु तालुका  कृषी अधिकारी बाहेरील  तालुक्यातील शेतक:यांना तशी परवाणगी देत नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले असून जिल्हाधिका:यांनी याबाबत लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. वास्तविक शासनाचा अध्यादेशात असे कुठेही नमुद केलेले नाही. जिल्हा उपनिबंधकांशी आपण संपर्क साधला असता त्यांनी देखील कुठल्याही तालुक्याचा शेतकरी कुठल्याही बाजार समितीत धान्य विकू शकतो असे सांगितले आहे. त्यामुळे कृषी विभागाने नोंद करून त्या त्या बाजार समितीकडे पाठविणे आवश्यक आहे. परंतु त्यांनी अध्यादेश समजून न घेतल्याने गोंधळ होत आहे. -हरि दत्तू पाटील, शेतकरी, प्रकाशा.