शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

‘एसएमएस’ येत नसल्याने धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:06 IST

25 टक्के प्रवेश प्रक्रिया : पालकांनी ‘अॅप्लीकेशन व्हाईस डिटेल्स’वर जाऊन तपासावे

नंदुरबार : 25 टक्के मोफत प्रवेश (आरटीई)अंतर्गत सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु आह़े या बाबत पहिल्या प्रवेश फेरीतील ऑनलाईन सोडत काढण्यात आली आह़े या सोडतीमध्ये ज्या विद्याथ्र्याचे नावे आले आहे, अशा विद्याथ्र्याच्या पालकांना एसएमएसव्दारे सूचना देण्यात येणार होती़ परंतु बहुतेक पालकांना याबाबत एसएमएस आलेलाच नसल्याने त्यांच्या मनात प्रवेशाबाबत धाकधूक वाढली आह़े पुणे येथे आरटीई प्रवेशासाठी पहिली ऑनलाईन सोडत काढण्यात आली़ राज्यभरातील आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी आलेल्या ऑनलाईन अर्जाची ही सोडत होती़ त्यामुळे पहिल्या सोडतीमध्ये जे विद्यार्थी प्रवेशास पात्र झाले आहे अशांना शिक्षण विभागाव्दारे एसएमएस पाठविण्यात येणार होता़ 8 एप्रिलला ही सोडत काढण्यात आली़ जिल्ह्यातील 140 विद्याथ्र्याची निवड यात करण्यात आली आह़े त्यामुळे  साधारणत: 10 एप्रिल नंतर संबंधित पालकांना एसएमएसव्दारे पुढील सूचना मिळणे आवश्यक होत़े परंतु आता जवळपास आठवडा उलटण्यात आला आह़े असे असूनही बहुतेक पालकांना एसएमएस आलेले नसल्याने आपल्या पाल्याच्या पहिल्या सोडतीमध्ये नाव आलेय की नाही? असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित झालेला आह़े  पडताळणीसाठी मार्ग नाहीपहिल्या सोडतीत ज्या विद्याथ्र्याचे नाव असेल, त्यांना एसएमएस येणार होता़ त्यामुळे आठवडा उलटूनही एसएमएस येत नसल्याने कदाचित पहिल्या सोडतीमध्ये आपल्या पाल्याचे नाव आले नसल्याचा समज अनेक पालकांनी करुन घेतला असल्याचे समजत़े बर, एसएमएस शिवाय आपल्या पाल्याचे पहिल्या सोडतीमध्ये नाव आलेय की नाही हे पडताळण्याचा दुसरा मार्गही माहिती नसल्याचे अनेक पालकांचे दुखणे आह़े त्यामुळे सध्या पालकांची चांगलीच घालमेल सुरु असल्याची स्थिती निर्माण झालेली आह़े केवळ 16 जणांचे प्रवेश निश्चितजिल्ह्यात आरटीईच्या 470 जागांचा कोटा ठरविण्यात आला आह़े जिल्ह्यातील एकूण 47 शाळांमार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आह़े 470 जागांसाठी जिल्ह्याभरातून केवळ 573 म्हणजे केवळ 103 अजर्च जास्त आले आहेत़ त्यामुळे 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार जिल्हा खुपच मागे असल्याचे यातून दिसून आले आह़े दरम्यान, 8 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या ऑनलाईन सोडत प्रक्रियेत जिल्ह्यातील 140 विद्याथ्र्याच्या नावाची निश्चिती करण्यात आलेली आह़े संबंधित विद्याथ्र्याचे कागदोपत्री तपासणी होऊन तद्नंतर आता पुढील प्रवेश प्रक्रियेत सामोरे जाण्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत़ दरम्यान आता 140 विद्याथ्र्यापैकी आठवडाभरात केवळ 16 विद्याथ्र्यानी आरटीईअंतर्गत आपली प्रवेश निश्चिती केली असल्याची माहिती आह़े तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये तीन आकडी विद्याथ्र्याचे प्रवेश झाल्याचे संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीवरुन दिसून येत आह़े दरम्यान, अनेक पालकांना प्रवेशासाठी कागदपत्रे गोळा करतानाही अनेक अडचणी येत आहेत़ सध्या आचारसंहिता सुरु असल्याने साहजिकच शासकीय अधिकारी कामात व्यग्र असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे पालकांची कागदोपत्री बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात धावपळ होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े पालकांच्या मनातील संभ्रमावस्था दुर करण्यासाठी संबंधित विभागाने मदत केंद्र सुरु करावे अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आह़े दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक ‘वजनदार’ पालक आपल्या विद्याथ्र्याचा आरटीईअंतर्गत नंबर लावण्यासाठी शिक्षण विभागात चकरा मारत असल्याचे सांगण्यात आले आह़े परंतु 8 एप्रिल रोजी काढण्यात आलेली सोडत प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक पध्दतीने पार पडल्याने यासाठी कुठलीही ‘सेटींग’ निरुपयोगी ठरत असल्याचे त्यांना समजवण्यात येत आह़े परंतु तरीही त्यांच्याकडून प्रवेशासाठी आग्रह धरला जात आह़े