शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एसएमएस’ येत नसल्याने धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:06 IST

25 टक्के प्रवेश प्रक्रिया : पालकांनी ‘अॅप्लीकेशन व्हाईस डिटेल्स’वर जाऊन तपासावे

नंदुरबार : 25 टक्के मोफत प्रवेश (आरटीई)अंतर्गत सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु आह़े या बाबत पहिल्या प्रवेश फेरीतील ऑनलाईन सोडत काढण्यात आली आह़े या सोडतीमध्ये ज्या विद्याथ्र्याचे नावे आले आहे, अशा विद्याथ्र्याच्या पालकांना एसएमएसव्दारे सूचना देण्यात येणार होती़ परंतु बहुतेक पालकांना याबाबत एसएमएस आलेलाच नसल्याने त्यांच्या मनात प्रवेशाबाबत धाकधूक वाढली आह़े पुणे येथे आरटीई प्रवेशासाठी पहिली ऑनलाईन सोडत काढण्यात आली़ राज्यभरातील आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी आलेल्या ऑनलाईन अर्जाची ही सोडत होती़ त्यामुळे पहिल्या सोडतीमध्ये जे विद्यार्थी प्रवेशास पात्र झाले आहे अशांना शिक्षण विभागाव्दारे एसएमएस पाठविण्यात येणार होता़ 8 एप्रिलला ही सोडत काढण्यात आली़ जिल्ह्यातील 140 विद्याथ्र्याची निवड यात करण्यात आली आह़े त्यामुळे  साधारणत: 10 एप्रिल नंतर संबंधित पालकांना एसएमएसव्दारे पुढील सूचना मिळणे आवश्यक होत़े परंतु आता जवळपास आठवडा उलटण्यात आला आह़े असे असूनही बहुतेक पालकांना एसएमएस आलेले नसल्याने आपल्या पाल्याच्या पहिल्या सोडतीमध्ये नाव आलेय की नाही? असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित झालेला आह़े  पडताळणीसाठी मार्ग नाहीपहिल्या सोडतीत ज्या विद्याथ्र्याचे नाव असेल, त्यांना एसएमएस येणार होता़ त्यामुळे आठवडा उलटूनही एसएमएस येत नसल्याने कदाचित पहिल्या सोडतीमध्ये आपल्या पाल्याचे नाव आले नसल्याचा समज अनेक पालकांनी करुन घेतला असल्याचे समजत़े बर, एसएमएस शिवाय आपल्या पाल्याचे पहिल्या सोडतीमध्ये नाव आलेय की नाही हे पडताळण्याचा दुसरा मार्गही माहिती नसल्याचे अनेक पालकांचे दुखणे आह़े त्यामुळे सध्या पालकांची चांगलीच घालमेल सुरु असल्याची स्थिती निर्माण झालेली आह़े केवळ 16 जणांचे प्रवेश निश्चितजिल्ह्यात आरटीईच्या 470 जागांचा कोटा ठरविण्यात आला आह़े जिल्ह्यातील एकूण 47 शाळांमार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आह़े 470 जागांसाठी जिल्ह्याभरातून केवळ 573 म्हणजे केवळ 103 अजर्च जास्त आले आहेत़ त्यामुळे 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार जिल्हा खुपच मागे असल्याचे यातून दिसून आले आह़े दरम्यान, 8 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या ऑनलाईन सोडत प्रक्रियेत जिल्ह्यातील 140 विद्याथ्र्याच्या नावाची निश्चिती करण्यात आलेली आह़े संबंधित विद्याथ्र्याचे कागदोपत्री तपासणी होऊन तद्नंतर आता पुढील प्रवेश प्रक्रियेत सामोरे जाण्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत़ दरम्यान आता 140 विद्याथ्र्यापैकी आठवडाभरात केवळ 16 विद्याथ्र्यानी आरटीईअंतर्गत आपली प्रवेश निश्चिती केली असल्याची माहिती आह़े तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये तीन आकडी विद्याथ्र्याचे प्रवेश झाल्याचे संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीवरुन दिसून येत आह़े दरम्यान, अनेक पालकांना प्रवेशासाठी कागदपत्रे गोळा करतानाही अनेक अडचणी येत आहेत़ सध्या आचारसंहिता सुरु असल्याने साहजिकच शासकीय अधिकारी कामात व्यग्र असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे पालकांची कागदोपत्री बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात धावपळ होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े पालकांच्या मनातील संभ्रमावस्था दुर करण्यासाठी संबंधित विभागाने मदत केंद्र सुरु करावे अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आह़े दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक ‘वजनदार’ पालक आपल्या विद्याथ्र्याचा आरटीईअंतर्गत नंबर लावण्यासाठी शिक्षण विभागात चकरा मारत असल्याचे सांगण्यात आले आह़े परंतु 8 एप्रिल रोजी काढण्यात आलेली सोडत प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक पध्दतीने पार पडल्याने यासाठी कुठलीही ‘सेटींग’ निरुपयोगी ठरत असल्याचे त्यांना समजवण्यात येत आह़े परंतु तरीही त्यांच्याकडून प्रवेशासाठी आग्रह धरला जात आह़े