शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

गोठय़ांचा निधी नसल्याने जनावरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आलेले 200 जनावरांचे गोठे निधीअभावी रखडले  आहे.   ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आलेले 200 जनावरांचे गोठे निधीअभावी रखडले  आहे.   या लाभाथ्र्याना आपली जनावरे यंदाही उन, वारा व पावसातच उभी करावी लागणार आहे. निधीबाबत वरिष्ठ प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी तळोदा तालुक्यातील आदिवासी लाभाथ्र्यानी केली आहे.ग्रामीण भागातील गरीब पशुपालकांची महागडे जनावरांचे उन, वारा, पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्ण्यासाठी राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेतून गोठय़ांची योजना गेल्या दोन वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. संबंधीत गावांच्या ग्रामपंचायतीमार्फत ही योजना राबवायची असते. या योजनेतून अकुशल व गुराळ अशा दोन्ही प्रकारच्या लाभाथ्र्याना यातून           रोजगार मिळणार आहे. साधारण 70 हजार रुपये एका गोठय़ास अनुदान आहे. यात अकुशल लाभार्थीस 12 हजार रुपये तर गोठा मालकास 58 हजार रुपयांचे अनुदान दिले जात असते. या योजनेतून तळोदा तालुक्यात ही साधारण 275 गोठे मंजूर करण्यात आले आहे. तथापि, निधीअभावी सध्या तरी ही योजना रखडली आहे.वास्तविक या योजनेतून अकुशल कामगारांना रोजगार हमीतून राजगार उपलब्ध होण्या बरोबरच गरीब आदिवासी पशुपालकाच्या जनावरांचेही संरक्षण होऊ शकते. परंतु निधीबाबत या विभागातील वरिष्ठ प्रशासनाने उदासिन भूमिका घेतल्याचा आरोप लाभाथ्र्यानी केला आहे. पंचायत समितीने प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीस पाच गोठे मंजूर केले आहेत. त्यानुसार साधारण 75 लाभाथ्र्यानी उधार, उसनवारी व आपल्या खिशातून पैसे टाकून गोठे बांधलेली आहेत. या गोठय़ाच्या बांधकामाची प्रत्यक्ष जागेवर जावून पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी मोजमाप करून तशी माहिती सहा  महिन्यांपूर्वीच रोजगार हमी योजना विभागाकडे पाठविली आहे. अशी वस्तुस्थिती असताना संबंधित        यंत्रणेने गोठे मालकांना अजूनपावेतो अनुदान उपलब्ध करून दिलेले        नाही. पंचायत समितीनेदेखील जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करत निधीची मागणी केली आहे. परंतु वरूनच निधी मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. इकडे संबंधीत लाभार्थीने सावकाराकडून व्याजाने पैसे काढल्यामुळे त्यांचे पैसे देण्यासाठी पंचायत समितीकडे सातत्याने हेलपाटे मारत आहे. मात्र रक्कम आली नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून मिळत असल्याने निराश होऊन परत जावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली. शासनाने या योजनेतून अकुशल कामगाराची मंजुरी अदा केली आहे. परंतु कुशल लाभाथ्र्यास त्याचा अनुदानापासून वंचित ठेवत आहे. प्रशासनाच्या अशा दुजाभावाच्या धोरणाबाबत लाभाथ्र्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोठय़ांची थकीत रक्कमेबाबत पंचायत समितीच्या अधिका:यांनाही लाभाथ्र्याचा रोष पत्करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या योजनेचे अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा आहे.