शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गामुळे विकासाला मिळेल चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 12:11 IST

शेवाळी-नेत्रंग महामार्ग : हालचाली गतिमान, जमिन संपादन लवकरच होणार

ठळक मुद्दे नंदुरबार शहराला लाभ.. प्रस्तावीत महामार्ग नंदुरबारातून जाणार आहे. सध्या असलेल्या वळण रस्याचे चौपदरीकरण अपेक्षीत आहे. वास्तविक शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहराबाहेरून हा महामार्ग काढावा अशी मागणी आहे. परंतु त्यासाठी खाजगी जागा संपादीत करावी लागणार अ

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेवाळी ते नेत्रंग या जवळपास साडेचारशे किलोमिटर महामार्गाच्या कामासाठे हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच राज्याच्या हद्दीतील रस्त्यासाठी जमिन संपादनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान या महामार्गामुळे सुरत-नागपूर महामार्ग ते गुजरातधील एक्सप्रेसवे जोडले जाणार आहेत.सुरत-नागपूर महामार्गावरील साक्री तालुक्यातील शेवाळी फाटय़ापासून ते गुजरातमधील नेत्रंग गावार्पयत हा नवीन राष्ट्रीय महामार्ग राहणार आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील दुर्गम भाग जोडले जावे हा त्यामागचा उद्देश आहे. या महामार्गाला वर्षभरापूर्वी केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली होती. सहा महिन्यापूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग देखील करण्यात आला आहे. त्याची देखभाल व दुरूस्तीचे काम सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फतच सुरू आहे. आता या महामार्गासाठी जमिन संपादनाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गावांमध्ये जनसुनवाई घेण्यात येणार आहे.असा असेल महामार्गहा प्रस्तावीत महामार्ग शेवाळी फाटय़ापासून सुरू होऊन धुळे जिल्ह्यातील निजामपूर, छडवेल, नंदुरबार, हातोडापूल मार्गे तळोदा, अक्कलकुवा, खापरमार्गे गुजरात हद्दीत प्रवेश करणार आहे. गुजरातमध्ये राजपिपला, डेडीयापाडा व नेत्रंग येथे हा महामार्ग संपणार आहे. नेत्रंग येथून जाणा:या प्रस्तावित एक्सप्रेसवेला तो जोडला जाणार आहे. यामुळे नाशिक, धुळे, जळगाव भागाकडून अहमदाबाद, राजस्थानकडे जाणा:या मालवाहू वाहनांसाठी हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. दुर्गम भाग जोडला जाईलया महामार्गामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागासह गुजरातमधील दुर्गम भाग देखील जोडला जाणार आहे. दोन्ही राज्यांच्या सिमेवरील हा भाग दुर्गम व आदिवासी समजला जातो. या भागाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या महामार्गाचा मोठा उपयोग ठरणार आहे. धुळे येथील एमआयडीसी आणि नंदुरबारातील प्रस्तावीत एमआयडीसीमधील उत्पादीत माल देखील या मार्गाने गुजरात, राजस्थानमार्गे दिल्लीर्पयत पोहचविला जाऊ शकणार आहे. याशिवाय या महामार्गानेच थेट नागपूर, मुंबई आणि सुरत देखील जोडले जाणार असल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. जिल्ह्यातून जाणा:या एकुण महामार्गाच्या लांबीनुसार त्या त्या भागात जमीन संपादन करावी लागणार आहे. त्यासाठी जिल्हाधिका:यांच्या उपस्थितीत 31 ऑगस्ट रोजी जनसुनवणी देखील आयोजित करण्यात आली आहे. नवीन दरानुसार शेतक:यांना जमिनींचा मोबदला मिळतो किंवा कसा याकडे देखील आता लक्ष लागून आहे