शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गामुळे विकासाला मिळेल चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 12:11 IST

शेवाळी-नेत्रंग महामार्ग : हालचाली गतिमान, जमिन संपादन लवकरच होणार

ठळक मुद्दे नंदुरबार शहराला लाभ.. प्रस्तावीत महामार्ग नंदुरबारातून जाणार आहे. सध्या असलेल्या वळण रस्याचे चौपदरीकरण अपेक्षीत आहे. वास्तविक शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहराबाहेरून हा महामार्ग काढावा अशी मागणी आहे. परंतु त्यासाठी खाजगी जागा संपादीत करावी लागणार अ

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेवाळी ते नेत्रंग या जवळपास साडेचारशे किलोमिटर महामार्गाच्या कामासाठे हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच राज्याच्या हद्दीतील रस्त्यासाठी जमिन संपादनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान या महामार्गामुळे सुरत-नागपूर महामार्ग ते गुजरातधील एक्सप्रेसवे जोडले जाणार आहेत.सुरत-नागपूर महामार्गावरील साक्री तालुक्यातील शेवाळी फाटय़ापासून ते गुजरातमधील नेत्रंग गावार्पयत हा नवीन राष्ट्रीय महामार्ग राहणार आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील दुर्गम भाग जोडले जावे हा त्यामागचा उद्देश आहे. या महामार्गाला वर्षभरापूर्वी केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली होती. सहा महिन्यापूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग देखील करण्यात आला आहे. त्याची देखभाल व दुरूस्तीचे काम सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फतच सुरू आहे. आता या महामार्गासाठी जमिन संपादनाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गावांमध्ये जनसुनवाई घेण्यात येणार आहे.असा असेल महामार्गहा प्रस्तावीत महामार्ग शेवाळी फाटय़ापासून सुरू होऊन धुळे जिल्ह्यातील निजामपूर, छडवेल, नंदुरबार, हातोडापूल मार्गे तळोदा, अक्कलकुवा, खापरमार्गे गुजरात हद्दीत प्रवेश करणार आहे. गुजरातमध्ये राजपिपला, डेडीयापाडा व नेत्रंग येथे हा महामार्ग संपणार आहे. नेत्रंग येथून जाणा:या प्रस्तावित एक्सप्रेसवेला तो जोडला जाणार आहे. यामुळे नाशिक, धुळे, जळगाव भागाकडून अहमदाबाद, राजस्थानकडे जाणा:या मालवाहू वाहनांसाठी हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. दुर्गम भाग जोडला जाईलया महामार्गामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागासह गुजरातमधील दुर्गम भाग देखील जोडला जाणार आहे. दोन्ही राज्यांच्या सिमेवरील हा भाग दुर्गम व आदिवासी समजला जातो. या भागाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या महामार्गाचा मोठा उपयोग ठरणार आहे. धुळे येथील एमआयडीसी आणि नंदुरबारातील प्रस्तावीत एमआयडीसीमधील उत्पादीत माल देखील या मार्गाने गुजरात, राजस्थानमार्गे दिल्लीर्पयत पोहचविला जाऊ शकणार आहे. याशिवाय या महामार्गानेच थेट नागपूर, मुंबई आणि सुरत देखील जोडले जाणार असल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. जिल्ह्यातून जाणा:या एकुण महामार्गाच्या लांबीनुसार त्या त्या भागात जमीन संपादन करावी लागणार आहे. त्यासाठी जिल्हाधिका:यांच्या उपस्थितीत 31 ऑगस्ट रोजी जनसुनवणी देखील आयोजित करण्यात आली आहे. नवीन दरानुसार शेतक:यांना जमिनींचा मोबदला मिळतो किंवा कसा याकडे देखील आता लक्ष लागून आहे