शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

रोषमाळ खुर्द येथील पाणीपातळी खोल गेल्यामुळे नागरिकांना करावी लागतेय भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

तळोदा : धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्द गावात पाणी अत्यंत खोलवर गेल्यामुळे तेथील रहिवाशांना आटत चाललेल्या विहिरीचा आसरा घ्यावा लागत ...

तळोदा : धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्द गावात पाणी अत्यंत खोलवर गेल्यामुळे तेथील रहिवाशांना आटत चाललेल्या विहिरीचा आसरा घ्यावा लागत आहे. येथील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने मुख्यमंत्री पेयजल योजनेतून या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्द ही ग्रुप ग्रामपंचायत असून, या ग्रामपंचायतीला तब्बल २५ पाडे जोडली आहेत. गावाची लोकसंख्या साधारण एक हजार ३०० आहे. गावात हातपंपासाठी ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी कूपनलिका केल्या असल्या तरी येथील पाण्याची पातळी अत्यंत खोलवर गेली असल्यामुळे गावकऱ्यांना एकाच गाव विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. तीही आता आटण्याचा मार्गावर असल्यामुळे तेथून हंडाभर पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांना अक्षरशः मोठी गर्दी करावी लागत असते. याशिवाय पाण्यासाठी आजूबाजूच्या ठिकाणी भटकंती करावी लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच पाण्यासाठी पूर्ण दिवसदेखील खर्च करावा लागत असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. ग्रामपंचायतीने आता पुन्हा दोन बोअर केल्या होत्या. त्याही ४०० फूट केल्या होत्या. त्यावेळेस पाणी लागले होते; परंतु आता तेही आटले आहे. त्यामुळे रोषमाळ वासीयांना पाण्यासाठी दमछाक करावी लागत आहे. वास्तविक येथील पाण्याची पातळी प्रचंड खोलवर गेल्यामुळे येथे पुन्हा बोअर करणे अशक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने मुख्यमंत्री पेयजल योजनेचा विचार करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

आश्रमशाळेमध्ये देखील पाण्याची समस्या

या गावातच आदिवासी विकास विभागाची शासकीय आश्रमशाळा आहे. येथील मुलांनादेखील पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मुलांनादेखील गावातील विहिरींचा आसरा घ्यावा लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याबाबत पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना निवेदनसुद्धा देण्यात आले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, येथील आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत विद्यार्थीही उपस्थित आहेत. शाळेत विद्यार्थ्यांसाठी पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे तेही गावातील सार्वजनिक विहिरींचा वापर करत असतात. मात्र, तेथेच प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील पाण्यासाठी ताटकळत राहावे लागत असते. आपल्या स्तरावर या शाळेत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबूलाल पावरा यांनी केली आहे. दरम्यान, शाळेतील पाण्याच्या समस्येबाबत प्रकल्पातील एका अधिकाऱ्यास विचारले असता दोन कूपनलिका करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.

रोषमाळ खुर्द गावात पाण्याची पातळी तब्बल ४०० फुटांवर गेली आहे. तरीही दोन बोअर केल्या होत्या. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. सार्वजनिक विहीरदेखील आहे. तरीही मुख्यमंत्री पेयजल योजनेतून प्रस्ताव सादर करायचा आहे. - बी. एस. पवार, ग्रामसेवक, ग्रामपंचायत, रोषमाळ खुर्द, ता. धडगाव