शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

दरडी कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 17:03 IST

चांदसैली व देवगोई घाट : अनेक वाहनधारक जायबंदी, उपाय योजना गरजेची

कोठार : सातपुडा पर्वत चांदसैली व देवगोई घाटात अनेक ठिकाणी रविवारी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली असून घाटातील वाट अधिकच बिकट बनली आहे.दरवर्षी पावसाळ्यात सातपुडय़ातील सर्व घाटमार्गात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात़ या वर्षीदेखील सातपुडय़ातील अक्कलकुवा-मोलगीला जोडणा:या देवगोई घाट, तळोदा-धडगांव दरम्यानचा चांदसैली घाट या प्रमुख घाटाव्यतिरिक्त भरडीपादर ते कुवा दरम्यानचा घाट, कुंडी ते होराफळी दरम्यानचा घाट, दहेलचा घाट, या घाटातदेखील दरळी कोसळल्या आहेत. यातील देवगोई व चांदसैलीच्या घाटात सर्वाधिक वाहतुकीची वर्दळ असते. दरडी कोसळल्याने रस्त्यावर लहान-मोठे दगड पडलेले दिसून येत आहे. बारीक मुरून व मातीचे ढिगारे देखील निर्माण झाले आहे. सातपुडय़ाच्या पर्वत रांगामध्ये तुरळक पावसाची रिपरिप मागील आठ ते दहा दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे कोसळलेल्या दरडीच्या दगड-मातीमुळे घाटमार्गात अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. घाटातील तीव्र चढाव-उतार व त्यातच दरडीच्या मातीमुळे निर्माण झालेला चिखल या परिस्थितीमुळे वाहने घसरण्याची शक्यता असते. अनेकदा दरडी कोसळल्याने रस्त्यावर दगड व बारीक मुरूम पसरतात़ त्यामुळेदेखील अनेक छोटे-मोठे अपघात होत असतात़या सर्व परिस्थितीमुळे घाटातील वाट अधिकच बिकट बनली आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घाटात दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना या अपूर्ण ठरत आहे. काही ठिकाणी घाट मार्गात डोंगराच्या कडेला जेसीबीने चारी खोदून पाणी प्रवाहित करण्याच्या प्रय} केलेला आह़े तर काही ठिकाणी दरडी कोसळू नयेत यासाठी पक्क्या संरक्षक भिंती बांधल्या असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी दरळी कोसळल्या तर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी दरडीचे दगड व माती हटविण्यासाठी जेसीबी उपलब्ध असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. परंतु जेसीबी उपलब्ध असतांना देखील घाटात अनेक ठीकाणी दरडी कोसळल्यामुळे रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर निर्माण झालेले दगड व माती ढिगारे हटविण्यात आलेले नसल्याची स्थिती आहे. या ठिकाणी प्रशासनाने दरडी कोसळू नये म्हणून नेटच्या जाळ्या लावाव्यात अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आह़े वास्तविक आपत्ती व्यवस्थापन विभागा व सार्वजनिक बांधकाम विभागा यांनी समन्वय साधत पावसाळ्यापूर्वीच ही कामे करणे गजरेची होती़ परंतु तसे न झाल्याने या समस्या निर्माण होत  आह़े