शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

दरडी कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 17:03 IST

चांदसैली व देवगोई घाट : अनेक वाहनधारक जायबंदी, उपाय योजना गरजेची

कोठार : सातपुडा पर्वत चांदसैली व देवगोई घाटात अनेक ठिकाणी रविवारी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली असून घाटातील वाट अधिकच बिकट बनली आहे.दरवर्षी पावसाळ्यात सातपुडय़ातील सर्व घाटमार्गात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात़ या वर्षीदेखील सातपुडय़ातील अक्कलकुवा-मोलगीला जोडणा:या देवगोई घाट, तळोदा-धडगांव दरम्यानचा चांदसैली घाट या प्रमुख घाटाव्यतिरिक्त भरडीपादर ते कुवा दरम्यानचा घाट, कुंडी ते होराफळी दरम्यानचा घाट, दहेलचा घाट, या घाटातदेखील दरळी कोसळल्या आहेत. यातील देवगोई व चांदसैलीच्या घाटात सर्वाधिक वाहतुकीची वर्दळ असते. दरडी कोसळल्याने रस्त्यावर लहान-मोठे दगड पडलेले दिसून येत आहे. बारीक मुरून व मातीचे ढिगारे देखील निर्माण झाले आहे. सातपुडय़ाच्या पर्वत रांगामध्ये तुरळक पावसाची रिपरिप मागील आठ ते दहा दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे कोसळलेल्या दरडीच्या दगड-मातीमुळे घाटमार्गात अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. घाटातील तीव्र चढाव-उतार व त्यातच दरडीच्या मातीमुळे निर्माण झालेला चिखल या परिस्थितीमुळे वाहने घसरण्याची शक्यता असते. अनेकदा दरडी कोसळल्याने रस्त्यावर दगड व बारीक मुरूम पसरतात़ त्यामुळेदेखील अनेक छोटे-मोठे अपघात होत असतात़या सर्व परिस्थितीमुळे घाटातील वाट अधिकच बिकट बनली आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घाटात दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना या अपूर्ण ठरत आहे. काही ठिकाणी घाट मार्गात डोंगराच्या कडेला जेसीबीने चारी खोदून पाणी प्रवाहित करण्याच्या प्रय} केलेला आह़े तर काही ठिकाणी दरडी कोसळू नयेत यासाठी पक्क्या संरक्षक भिंती बांधल्या असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी दरळी कोसळल्या तर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी दरडीचे दगड व माती हटविण्यासाठी जेसीबी उपलब्ध असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. परंतु जेसीबी उपलब्ध असतांना देखील घाटात अनेक ठीकाणी दरडी कोसळल्यामुळे रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर निर्माण झालेले दगड व माती ढिगारे हटविण्यात आलेले नसल्याची स्थिती आहे. या ठिकाणी प्रशासनाने दरडी कोसळू नये म्हणून नेटच्या जाळ्या लावाव्यात अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आह़े वास्तविक आपत्ती व्यवस्थापन विभागा व सार्वजनिक बांधकाम विभागा यांनी समन्वय साधत पावसाळ्यापूर्वीच ही कामे करणे गजरेची होती़ परंतु तसे न झाल्याने या समस्या निर्माण होत  आह़े