शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

११ जि.प.सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने राजकीय चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST

नंदुरबार : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने जिल्हा परिषदेच्या ११ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. याशिवाय तीन ...

नंदुरबार : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने जिल्हा परिषदेच्या ११ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. याशिवाय तीन पंचायत समितीच्या १४ सदस्यांचेही सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यात नंदुरबार पंचायत समितीच्या पाच, शहाद्याच्या आठ तर अक्कलकुवा पंचायत समितीचे एक सदस्याचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या पीठासमोर आव्हान देण्याचा निर्णय जिल्ह्यातील नेत्यांनी घेतला आहे. त्यासंदर्भात त्यांची प्राथमिक बैठकदेखील झाली.

आरक्षणाच्या मुद्यावरून वर्षभर जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या होत्या. जानेवारी २०२० मध्ये निवडणुका झाल्यानंतर नेत्यांना हायसे वाटले. जेमतेम वर्ष उलटत नाही तोच आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यांच्या पीठाने निर्णय दिला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ११ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून त्या जागांवर नवीन निवडणुका घ्याव्या तसेच पंचायत समितीच्या १४ जागांवरदेखील नवीन निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार या सर्व सदस्यांचे सदस्यत्व ४ मार्चपासून रद्द ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा ओबीसींनाच सर्वाधिक फटका बसला आहे. कारण ओबीसींच्या राखीव असलेल्या सर्वच ११ जागा या आता ओपन होणार आहेत. त्यात सर्वच प्रवर्गांना निवडणूक लढवता येणार आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेतील ५६ पैकी ११ सदस्य ओबीसी प्रवर्गातील एक सदस्य एस.सी. प्रवर्गातील तर उर्वरित सर्व सदस्य हे एस.टी. प्रवर्गातील आहेत.

४ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर ५ मार्च रोजी सायंकाळी उशीरा राज्य निवडणूक आयोगाने आदेश काढून सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणे आणि त्या जागांवर नव्याने निवडणूक घेण्याचे म्हटले आहे. त्यामुळे तर विद्यमान ११ जि.प.सदस्य व १४ पंचायत समिती सदस्यांचे धाबे दणाणले आहे. ११ जि.प. सदस्यांमध्ये तीन सदस्य हे विद्यमान पदाधिकारी आहेत.

चर्चेला उधाण

न्यायालयाचा निर्णय आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने काढलेला आदेश यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी दिवसभर याच विषयावर चर्चा सुरू होती. अनेक राजकीय तर्कवितर्क देखील लावले जात होते. आगामी राजकारणाची दिशा कशी असेल याबाबतही मतेमतांतरे सुरू होती.

यांचे झाले सदस्यत्व रद्द

उपाध्यक्ष राम रघुवंशी (कोपर्ली), शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री पाटील (लोणखेडा), कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती अभजित पाटील (म्हसावद) यांच्यासह सदस्य धनराज पाटील (पाडळदा), शकुंतला शिंत्रे(रनाळा), योगिनी भारती (कोळदे), रुचिका पाटील(मांडळ), शोभा शांताराम पाटील(खोंडामळी), भूषण कामे(खापर), कपिल चौधरी(अ्क्कलकुवा), शालिनीबाई सनेर(कहाटूळ) यांचा समावेश आहे.

पंचायत समिती गण

१४ पंचायत समिती गणांमधील सदस्यांचेही सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यात शहादा तालुक्यातील आठ, नंदुरबार तालुक्यातील पाच तर अक्कलकुवा तालुक्यातील एका गणाचा समावेश आहे. त्यात सुलतानपूर, मंदाणा, डोंगरगाव, खेडदिगर, पाडळदे बु., जावदेतर्फे बोरद, चांदसैली, मोहिदेतर्फे हवेली, पातोंडा, गुजर भवाली, गुजर जांभोली, कोराई, नांदर्खे, होळतर्फे हवेली या गणांचा समावेश आहे.

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यासाठी आपल्यासह सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती अभिजीत पाटील, उपाध्यक्ष राम रघुवंशी यांची बैठक झाली. जिल्ह्याच्या वतीने न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.

-चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार तथा शिवसेना नेते.