शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

५० पेक्षा अधीक गावांचा घसा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाशी लढतांना आता प्रशासनाला पाणी टंचाईच्या उपाययोजनांकडेही लक्ष द्यावे लागत आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाशी लढतांना आता प्रशासनाला पाणी टंचाईच्या उपाययोजनांकडेही लक्ष द्यावे लागत आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यातील ५० पेक्षा अधीक गावे पाणी टंचाईने होरपळत आहेत. तेथे उपाययोजनांसाठी प्रशासनाची कसरत होत आहे.जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची स्थिती राहणार नाही अशी शक्यता होती. परंतु अनेक भागात पाणी अडवून ते भुगर्भात जिरविण्याची सोय नसल्यामुळे बऱ्याच गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. यंदाची स्थिती देखील तशीच आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील गावे आणि सातपुड्यातील डोंगर दºयातील गावांमधील ही स्थिती आहे.आता मिळाली गतीकोरोनाची दहशत आणि लॉकडाऊन यामुळे शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती जेमतेम राहत होती. परिणामी पाणी टंचाईच्या उपाययोजनांना गती मिळत नव्हती. आता टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्याने व ग्रामस्थांकडूनही ओरड होऊ लागल्याने प्रशासनाला हालचाल करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी देखील अधिकाºयांना याबाबत धारेवर धरत असल्यामुळे कुपनलिकांना हातपंप बसविणे, कुपनलिका दुरूस्त करणे, खाजगी विहिर अधिग्रहण करणे अशा उपाययोजनांना सुरुवात झाली आहे.५० पेक्षा अधीक गावेजिल्ह्यातील १ लाख दोन हजार ९१२ लोकसंख्येच्या ४८ गावे व ११ पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.नंदुरबार तालुक्यातील ५७,३२७ लोकसंख्येच्या २४ गावांमध्ये टंचाई आहे. उपाययोजनांमध्ये सर्वच २४ ठिकाणी विहिर अधिग्रहण प्रस्तावीत आहे. त्यावर कामे सुरू आहेत.नवापूर तालुक्यातील १२,०१२ लोकख्येंच्या १५ ग्रामपंचायतीची सहा गावे व ९ पाड्यांमध्ये ९ ठिकाणी विहिर अधीग्रहण तर ६ ठिकाणी विंधन विहिर घेण्यात येणार होत्या. शहादा तालुक्यातील २९,०२३ लोकसंख्येच्या १२ गावांमध्ये कुपनलिका खोदण्यात येणार होत्या. अक्लककुवा तालुक्यातील ३,४२४ लोकसंख्येच्या ४ गावांमध्ये चारही ठिकाणी विंधन विहिर खोदण्यात येणार आहेत.धडगाव तालुक्यात १,१२६ लोकसंख्येच्या दोन गावे व दोन पाड्यांमध्ये दोन ठिकाणी विहिर अधिग्रहण तर दोन ठिकाणी टँकर प्रस्तावीत आहे.भौगोलिक अडसरपाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी अनेक भागात भौगोलिक अडसर देखील येत आहेत. सातपुड्यातील काही गाव व पाड्यांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत. साधी पायवाट आहे. अशा ठिकाणी कुपनलिका खोदण्याचे मशीन जावू शकत नाही. दुर्गम भागात नळपाणी पुरवठा योजना राबविणे देखील अडचणीचे आहे. सौर पंपाद्वारे काही ठिकाणी तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाल्या. परंतु सौर पॅनेल खराब झाल्यामुळे देखील अशा ठिकाणी या योजना ठप्प पडल्या आहेत.

सातपुड्यातील अनेक भागातील ग्रामस्थ दऱ्याखोऱ्यांमधील झºयांमधील पाण्यावर आपली तहान भागवत आहेत.गेल्यावर्षी सातपुड्यातील तळोदा तालुक्यतील काही गावे पाड्यांना पाणी पुरवठ्याची कुठलीही सोय नसल्याने गाढवावरून पाणी न्यावे लागून त्या गावातील लोकांची तहान भागवावी लागली होती.गेल्यावर्षी टंचाई कृती आराखडाअंतर्गत करण्यात आलेल्या कुपनलिकांना तातडीने हातपंप बसविण्यासाठी ग्रामिण पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.