शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

दुर्गम भागात पावसाच्या धाकातच मळणीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काही दिवसांपासून पाऊस बंद असला तरी पावसाचे वातावरण कायम राहिले आहे, त्यामुळे  पाऊस होण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : काही दिवसांपासून पाऊस बंद असला तरी पावसाचे वातावरण कायम राहिले आहे, त्यामुळे  पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुर्गम भागात पावसाच्या धाकातच मळणीची कामे सुरू आहे. अचानक पाऊस सुरु झाल्यास तातडीने शेतमाल झाकता यावा यासाठी दुर्गम भागातील काही शेतक:यांनी धावपळ करीत प्लॅस्टिकवर मळणी सुरू केली आहे.दुर्गम भागात प्रतीकुल भौगोलिक परिस्थीतीमुळे नगदी पिके घेतली जात नसून केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली अन्न-धान्याचीच पिके घेतली जात आहे. त्यात ज्वारी, मका, उडीद,भात व भगरवर्गिय सहा-सात प्रकारच्या पिकांचा समावेश आहे. परंतु या अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पिके सडल्याने नुकसान झाले. जी पिके हाती आली ती पिकेही पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होत असल्याने                      धोक्यात सापडली आहे. हातातली पिके वाचविण्यासाठी धडगाव व मोलगी भागातील शेतक:यांची धावपळ सुरू आहे. धडगाव तालुक्यातील वेलीआंबा, चिंचकाठी, उखळीआंबा, काकरपाटी, पिंपळबारी तर अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार, काठी, चनवाई या परिसरातील शेतक:यांनी मळणीच्या कामांना सुरूवात केली आहे. तर सुरवाणी, खांडबारा, खडक्या, मोजरा, कुंडल, खुंटामोडी या परिसरातील शेतक:यांनी भात पिकाच्या               मळणीवर भर दिला आहे. परंतु आजही पावसाचे वातावरण कायम राहिल्यामुळे शेतक:यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. दुर्गम भागात पिके मळणीसाठी मोठ-मोठी तथा कायमची खळे तयार  करण्यात आली आहे. सर्व खळे मळणीसाठी सुस्थितीत असतानाही केवळ पावसाच्या  भितीमुळेच  प्रत्येक शेतक:यांकडून प्लॅस्टिकचा वापर करण्यात येत आहे. अचानक पाऊस सुरू झाल्यास तातडीने खळ्यातला शेतमाल व मळणी सुरू असलेली पिके झाकता यावी म्हणून प्लॅस्टिकवर मळणीची कामे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उरलेली पिके तरी सुरक्षीत राहती अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

घास हिरावलापावसावर अवलंबून असलेली शेती करणा:या दुर्गम शेतक:यांची पिके अतिवृष्टीनंतर अवकाळी पावसाने हिरावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले असल्याचे सांगण्यात येत आहे.