शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात पावसाच्या धाकातच मळणीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काही दिवसांपासून पाऊस बंद असला तरी पावसाचे वातावरण कायम राहिले आहे, त्यामुळे  पाऊस होण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : काही दिवसांपासून पाऊस बंद असला तरी पावसाचे वातावरण कायम राहिले आहे, त्यामुळे  पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुर्गम भागात पावसाच्या धाकातच मळणीची कामे सुरू आहे. अचानक पाऊस सुरु झाल्यास तातडीने शेतमाल झाकता यावा यासाठी दुर्गम भागातील काही शेतक:यांनी धावपळ करीत प्लॅस्टिकवर मळणी सुरू केली आहे.दुर्गम भागात प्रतीकुल भौगोलिक परिस्थीतीमुळे नगदी पिके घेतली जात नसून केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली अन्न-धान्याचीच पिके घेतली जात आहे. त्यात ज्वारी, मका, उडीद,भात व भगरवर्गिय सहा-सात प्रकारच्या पिकांचा समावेश आहे. परंतु या अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पिके सडल्याने नुकसान झाले. जी पिके हाती आली ती पिकेही पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होत असल्याने                      धोक्यात सापडली आहे. हातातली पिके वाचविण्यासाठी धडगाव व मोलगी भागातील शेतक:यांची धावपळ सुरू आहे. धडगाव तालुक्यातील वेलीआंबा, चिंचकाठी, उखळीआंबा, काकरपाटी, पिंपळबारी तर अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार, काठी, चनवाई या परिसरातील शेतक:यांनी मळणीच्या कामांना सुरूवात केली आहे. तर सुरवाणी, खांडबारा, खडक्या, मोजरा, कुंडल, खुंटामोडी या परिसरातील शेतक:यांनी भात पिकाच्या               मळणीवर भर दिला आहे. परंतु आजही पावसाचे वातावरण कायम राहिल्यामुळे शेतक:यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. दुर्गम भागात पिके मळणीसाठी मोठ-मोठी तथा कायमची खळे तयार  करण्यात आली आहे. सर्व खळे मळणीसाठी सुस्थितीत असतानाही केवळ पावसाच्या  भितीमुळेच  प्रत्येक शेतक:यांकडून प्लॅस्टिकचा वापर करण्यात येत आहे. अचानक पाऊस सुरू झाल्यास तातडीने खळ्यातला शेतमाल व मळणी सुरू असलेली पिके झाकता यावी म्हणून प्लॅस्टिकवर मळणीची कामे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उरलेली पिके तरी सुरक्षीत राहती अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

घास हिरावलापावसावर अवलंबून असलेली शेती करणा:या दुर्गम शेतक:यांची पिके अतिवृष्टीनंतर अवकाळी पावसाने हिरावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले असल्याचे सांगण्यात येत आहे.