शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

कृषी क्रांतीमुळेच विदेशी कंपन्यांचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:11 IST

पारंपारिक बियाणे संवर्धन चर्चासत्र : केंद्रीय कृषी राज्यमंत्री रुपला यांचे प्रतिपादन

नंदुरबार : कृषी क्रांतीच्या नावाखाली आपणच विदेशी बियाणे कंपन्यांना भारतात आणले. कृषी उत्पादन वाढीसाठी तेंव्हा ते आवश्यक होते. परंतु आता भारतातील कृषी तज्ज्ञांनी विविध वाण विकसीत केले आहेत. पारंपारिक बियाण्यांमध्ये संशोधन होत आहे. त्यामुळे हायब्रीड बियाणे घ्यायचे की आपले पारंपारिक बियाण्यांचे अधीक संवर्धन करायचे हे ठरविणे आपल्या हातात असल्ययाचे केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी पारंपारिक बियाण्यांचे जतन व संवर्धन या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपात बोलतांना केले.दोन दिवशीय चर्चासत्राचा समारोप रविवारी सायंकाळी राज्यमंत्री रुपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, कुलगुरु डॉ.के.पी.विश्वनाथा, हेडगेवार सेवा केंद्राचे कृष्णदास पटेल, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.गजानन डांगे, मनोज सोलंकी आदी उपस्थित होते. समारोपाच्या भाषणात राज्यमंत्री रुपाला यांनी सांगितले, केंद्र व राज्य सरकारने शेतक:यांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. त्याचा जास्तीत जास्त फायदा सामान्य शेतक:यांनी घेणे आवश्यक आहे. लहान शेतक:यांना कमी क्षेत्रात अपेक्षीत शेती उत्पादन घेता येत नाही. यासाठी गट शेतीचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या माध्यमातून मोठय़ा क्षेत्रात विविध पीक उत्पादन घेतले जाते. त्यातून उत्पादीत होणा:या मालावर प्रक्रिया केल्यास त्यावर आयकर माफ करण्यात आलेला आहे. या माध्यमातून व्यापारी शेतक:यांच्या बांधार्पयत येवून कृषी माल खरेदी करू शकणार आहे. उत्पादन खर्चावर आधारीत किमान आधारभूत किंमत केंद्र शासनाने ठरविली आहे. त्याचा चांगला फायदा शेतक:यांना होत आहे. शेतक:यांना आंदोलनाला उकसविणा:यांना पीकाचे उत्पादन कसे करावे याची माहिती तरी आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतीमध्ये मॅनेजमेंट हा प्रकार गेल्या काही वर्षापासून आला आहे. अशा प्रकारे शेती कराल तर नुकसान होईलच असे सांगून ते म्हणाले, 1980 च्या दशकार्पयत शेतात मजूर हा प्रकारच नव्हता. कुटूंबातील व्यक्तीच शेती करीत होते. कुटूंबातील व्यक्तींचा सूर्योदय हा शेतातच होत होता. आता मात्र मजुरांवर शेती अवलंबून आहे. कुटूंबातील व्यक्ती केवळ देखरेख करीत आहे. मजूर सकाळी नऊ वाजता येतो, सायंकाळी पाच वाजता निघून जातो. कसे पिकांचे संवर्धन होईल, कसे उत्पादन वाढेल असेही त्यांनी सांगितले. शेतीतून श्रम निघून गेले आहे. कमी श्रमात, कमी वेळेत जास्त उत्पादनाची अपेक्षा कराल तर नुकसान होईलच असेही त्यांनी सांगितले. खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, नंदुरबार सारख्या भागात पारंपारिक बियाण्यांचे जतन मोठय़ा प्रमाणावर केले जाते. आधुनिक आणि पारंपारिक या दोन्हींचा मेळ घालत आमचा शेतकरी शेती उत्पादन घेत आहे. जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विविध शेतीउपयोगी प्रयोग केले जात आहे. जमीन आरोग्य पत्रिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा फायदा पीक नियोजनात केला जात आहे. सेंद्रीय शेतीला आजही आमचा आदिवासी शेतकरी प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले. सीड बँकेच्या माध्यमातून देखील पारंपारिक वाणांचे जतन केले जात असल्याचे खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले. डॉ.गजानन डांगे यांनी चर्चासत्राच्या माध्यमातून मिळालेल्या उपलब्धीबाबत विवेचन केले. सूत्रसंचलन डॉ. बी.गुणाकार यांनी केले तर आभार कृष्णदास पटेल यांनी मानले.