शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

बालकांपेक्षा पालकांवरच दुप्पट खर्च

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: August 18, 2017 12:09 IST

कुपोषण मुक्तीचा असाही फंडा : ग्राम बालविकास केंद्रांमधील चित्र

ठळक मुद्दे बालकांवर दिवासाला 55 तर पालकांवर होणार 105 रुपये खर्च जिल्ह्यात 1,674 सॅम बालके 4कुपोषणाच्या दोन श्रेणीनुसार बालकांचे कुपोषणाचे प्रमाण ठरविले जाते. पूर्वी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी श्रेणी ठरविली जात होती. आता केवळ सॅम आणि मॅम या नुसारच तीव्र व सामान् 78 केंद्रांचे पहिल्या टप्प्यात नियोजन जिल्ह्यात यंदा जवळपास दिडशे ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 78 ठिकाणी ही केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्रांमध्ये सॅम बालकांना 30 दिवस ठेवण्यात येणार आहे. दररोज सकाळी आठ वाजपहिल्या टप्प्यातील 78 केंद्रांना दोन कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. दुस:या टप्प्यात देखील तेवढीच बालविकास केंद्र मंजुर होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा ुउपलब्ध राहणार आहेत. -अशोक बागुल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महि

मनोज शेलार ।ऑनलाईन लोकमतदिनांक 18 ऑगस्टनंदुरबार : कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 78 ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रात भरती होणा:या कुपोषीत बालकावर दिवसाला 55 रुपये तर त्याला आणणा:या पालकावर 105 रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे कुपोषण बालकाचे कमी होईल की पालकाचे हा संशोधनाचाच विषय ठरणार आहे.          जिल्ह्यात विशेषत: धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात कुपोषीत बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महिला व बालकल्याण विभागातर्फे ज्या भागात सर्वाधिक कुपोषीत बालके आहेत त्या भागातील गावांमध्ये अंगणवाडीच्या माध्यमातून ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव करून तब्बल दोन कोटी रुपये खर्चास देखील मान्यता दिली आहे. असा होईल खर्चग्राम बालविकास केंद्रात बालकाला आणल्यानंतर त्याला विशिष्ट आहार, पोषक औषधी दिली जातील. एका दिवसाला या माध्यमातून बालकावर 55 रुपये खर्च करण्याची तरतूद आहे. या बालकाला जो पालक अर्थात आई किंवा वडिल यापैकी एकजण घेवून येईल त्याला त्याची बुडीत मजुरीपोटी त्याला 85 रुपये रोज आणि एक वेळ जेवनाचा भत्ता म्हणून 25 रुपये दिले जाणार आहेत. अर्थात बालकावर 55 रुपये तर त्याच्या पालकावर 105 रुपये खर्च होणार आहे. बालकापेक्षा पालकावर 50 रुपये जादा खर्च राहणार आहे.केंद्रात बालकांना सुविधाग्राम बालविकास केंद्रात बालके ही सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेर्पयत अर्थात दिवसातले दहा तास राहणार असल्यामुळे या ठिकाणी बालकांसाठी पाळणा, लहान खेळणी राहणार आहेत. अंगणवाडी केंद्राच्या परिसरातच ही बालविकास केंद्र राहणार असल्यामुळे स्वच्छतागृहे आणि पाण्याचेही व्यवस्था अशा ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. दर आठ दिवसांनी या बालकांचे वजन घेतले जाते.केवळ औपचारिकता नकोग्राम बालविकास केंद्रांची जिल्ह्यात केवळ औपचारिकता राहू नये. गेल्या काही वर्षातील तो अनुभव आहे. अंगणवाडी केंद्रात दिवसभर बालकांना ठेवले जाते. त्यांचे पोषण किती आणि कसे होते हा संशोधनाचा विषय असतो. परंतु कागदपत्र रंगविले जावून सर्वच अलबेल दाखविले जाते.