शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

सूडाचे राजकारण नको; आता विकासासाठी समन्वय हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 13:12 IST

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली जिल्ह्यातील राजकारणाची धुसफूस अखेर जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीपर्यंत ...

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली जिल्ह्यातील राजकारणाची धुसफूस अखेर जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीपर्यंत उघडपणे समोर आले असून राजकीय गटतटाची दिशा आता स्पष्ट झाली आहे. अर्थातच जिल्हा निर्मितीपासून जिल्ह्यातील राजकारणातील गटतट हे विकासाच्या श्रेयाच्या राजकारणाने जिल्ह्यासाठी नेहमीच अडचणीचे ठरले आहे. आता नव्याने राजकारणाची बांधणी झाली असून नवे राजकारण तरी सूड आणि श्रेयाच्या चौकटीतून बाहेर येऊन समन्वयाच्या भूमिकेतून विकासाची गती वाढविणारे असावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राजकारणाचा जो चेहरा जिल्ह्यातील जनतेने अनुभवला नव्हता तो चेहरा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व सभापती निवडणुकीत पहायला मिळाला. अर्थात त्यातून राजकारणाचे गटतटही लोकांसमोर आले आहेत. पक्षीय राजकारणापलिकडे जिल्ह्यातील विकासासाठी स्थानिक राजकारण महत्त्वाचे असते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाचे गटतट पाहिल्यास ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक व शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांचा चांगला सूर जुळलेला दिसतो. तर दुसरीकडे आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांचा गट आहे. त्याला भाजपच्या दोन गटांपैकी आमदार राजेश पाडवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या गटाने तरी जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीत पूर्णपणे समर्थन दिल्याचे स्पष्ट आहे. तर माजी मंत्री व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनीदेखील जि.प. सभापती निवडणुकीत अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्या गटाला समर्थन दिले असले तरी विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे सहकार्य मिळाल्याने त्यांची नाळ कुठे ना कुठे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशीही जुळलेली दिसते. अर्थात पक्षीय राजकारणापेक्षा नेत्यांमधील अंतर्गत मतभेदाच्या राजकारणाचा प्रभाव जिल्ह्याच्या राजकारणात पूर्वीप्रमाणेच सध्याही आहे.जिल्हा निर्मितीपासून आतापर्यंतची राजकीय स्थिती पाहिल्यास जिल्ह्यात चंद्रकांत रघुवंशी, सुरुपसिंग नाईक, माणिकराव गावीत, अ‍ॅड.के.सी. पाडवी, अ‍ॅड.पद््माकर वळवी विरोधात आमदार डॉ.विजयकुमार गावीत असे राजकारण राहिले आहे. दरम्यानच्या काळात सुमारे १५ वर्षे डॉ.विजयकुमार गावीत मंत्री होते. त्यावेळी काँग्रेस आणि राष्टÑवादी आघाडीचे सरकार होते. डॉ.गावीत हेदेखील राष्टÑवादीचे तेव्हा मंत्री होते. परंतु आघाडीचे सरकार असतानादेखील जिल्ह्यात तेव्हा स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्टÑवादीतील टोकाला गेलेल्या मतभेदामुळे विकास कामांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचा अनुभव जिल्हावासीयांनी घेतला आहे.या पार्श्वभूमीवर आतादेखील पूर्वीप्रमाणेच मतभेदाचे राजकारण विकासाआड येणार नाही ना? याची भीती जनतेला लागून आहे. कारण आता राज्यात काँग्रेस, राष्टÑवादी व शिवसेना या महाआघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. तर जिल्ह्यात आता काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते यांच्यातीलच मतभेद वाढत आहेत. काँग्रेसच्या वाट्याला मंत्रीपद आले आहे पण महाआघाडीतीलच घटक असलेल्या शिवसेनेला काँग्रेसने जि.प. सभापती निवडणुकीत जोरदार धक्का दिल्याने साहजिकच स्थानिक शिवसेना नेत्यांशी विरोध पत्करला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसच्या भूमिकांना देखील शिवसेनेचा विरोध पत्करावा लागेल, असे संकेत आहेत. खास करून विकास कामांच्या बाबतीत देखील श्रेयाच्या वादातून विरोधाचे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.नुकतेच जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्याची प्रचिती आली आहे. जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवड झाली आहे. त्यात अध्यक्षपद काँग्रेसकडे व उपाध्यक्षपद शिवसेनेकडे आणि दोन सभापतींपैकी एक सभापती काँग्रेसकडे आणि दुसरे सभापतीपद भाजपकडे आहे. राजकारणाची विचित्र अवस्था जि.प.च्या राजकारणात आहे. कारण येथे काँग्रेस आणि भाजपची युती आहे तर विरोधक शिवसेना झाली आहे. गंमतीची बाब म्हणजे शिवसेना देखील सत्तेत अर्थात उपाध्यक्षपद मिळाले आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी पदभार स्वीकारले आहेत. हा पदभार स्वीकारल्यानंतर उपाध्यक्षांनी आपल्या दालनातील जागा कमी असल्याने दालनातच असलेली एक भिंत पाडली. पण त्याचे पडसाद लागलीच उमटले. परवानगी न घेता भिंत पाडल्याने दोन कनिष्ठ अभियंत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे प्रकरण सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहे. या एका घटनेतून जिल्हा परिषदेत चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र असलेले उपाध्यक्ष राम रघुवंशी यांना सत्ताधारी काँग्रेस व भाजपचा विरोध राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचेच प्रतिबिंब जिल्ह्याच्या राजकारणातही दिसणार आहेत. ही सुरुवात असली तरी त्यातून कुठे ना कुठे वैमनस्याचे व सूडाच्या राजकारणाचा वास येत आहे. असे राजकारण जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासासाठी घातक ठरणारे आहे. त्यामुळे आगामी काळात नेत्यांनी समन्वयाच्या राजकारणातून जिल्ह्याचा विकास गतीमान करावा, अशी अपेक्षा जिल्हावासी करीत आहेत.