शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, नंतर दोन महिने थांबावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनाची लस घेतल्यानंतर स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांना दोन महिने थांबावे लागणार आहे. आयसीएमआरने यासंदर्भातील एक पत्रच जिल्ह्यातील ...

नंदुरबार : कोरोनाची लस घेतल्यानंतर स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांना दोन महिने थांबावे लागणार आहे. आयसीएमआरने यासंदर्भातील एक पत्रच जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना दिले आहे. यातून रक्तदात्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व जनकल्याण अशा दोन रक्तपेढ्या आहेत. या ठिकाणाहून गरजवंतांना तातडीने रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. कोरोनाकाळात या ठिकाणाहून रक्तपुरवठा करण्यात अडचणी आल्याचे दिसून आले होते. सध्या सुरू असलेल्या कोरोना लसीकरण काळातही हीच स्थिती आहे. रक्त संकलन कमी झाले असल्याने चिंता वाढल्या आहेत. यातच लसीचा पहिला डोस घेतल्यावर २८ तर दुसरा डोस घेतल्यावर २८ दिवस रक्तदान करणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्याने ही टंचाई वाढण्याची भीती आहे. यामुळे कोरोना लसीकरणापूर्वी अनेक जण रक्तदान करून घेण्यासाठी रक्तपेढ्या गाठत आहेत.

कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन ही लस घेतल्यानंतर संबधितांना ताप येणे किंवा इतर तत्सम लक्षणे दिसून येतात. अशा काळात रक्तदान करणे धोकादायक ठरू शकते. अशक्तपणा येण्याची दाट शक्यता असल्याने पहिल्या व दुसऱ्या डोसनंतर ठरावीक काळाने लस घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

रक्तदान करण्यासाठी उत्सुक असलेल्यांनी लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे सूचित करण्यात आले आहे. याबाबत विशेष अशा सूचना रक्तपेढ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कामकाज करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. अनेक जण लस घेण्याआधी संपर्क करत असल्याची माहिती आहे.

लस घेण्याआधी केले रक्तदान

कोरोना लस घेण्यापूर्वी रक्तदान केले आहे. इतरांनीही याच प्रकारे रक्तदान केल्यास रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा होणार आहे. यातून गरजूंना रक्त देण्याची वेळ आल्यास ती तातडीने पूर्ण करण्यात येईल. कोरोना लस घेणे आणि रक्तदान याबाबत सोशल मीडियात काही गैरसमज आहेत. नागरिकांनी त्याकडे लक्ष न देता, तज्ज्ञांचा सल्ला घेत लस घ्यावी, ही अपेक्षा आहे.

- मोहन सूर्यवंशी, रक्तदाता, नंदुरबार

रक्तदान करण्यासाठी नियमित येणारे रक्तदाते संपर्कात आहेत. ४५ पूर्ण केलेले अनेक जण लस घेणार आहेत. तत्पूर्वी एकदोघांनीच रक्तदान केले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी योग्य पद्धतीने लस घ्यावी.

- डाॅ. के.डी. सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

लस घेतल्यानंतरचा अशक्तपणा हा व्यक्तीच्या प्रकृतीवर परिणाम करणारा आहे. यामुळे लस घेतल्यानंतर रक्तदान कधी करावे याबाबत रुग्णांना वेळोवेळी सल्ले देत आहोत. रक्तपेढीच्या संचालकांसोबत बोलून नागरिकांना माहिती देत आहोत.

- डाॅ. राजेश वळवी,

अध्यक्ष, माडा, नंदुरबार