शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
2
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
3
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
4
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
5
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
6
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
7
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
8
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
9
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
10
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!
11
'सिंधूच्या प्रत्येक थेंबावर आमचा हक्क आहे', पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मुक्ताफळे
12
जाऊबाई जोरात, एकमेकींच्या पडल्या प्रेमात; घरातून पळाल्या, २ वर्षांनी परतल्या अन् म्हणाल्या...
13
काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी
14
१० हजारांच्या SIP द्वारे ५ वर्षात १२ लाख! चौपट नफा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड योजना
15
5G फोन पाच हजारांत! भारतात नवी कंपनी आपले स्मार्टफोन घेऊन येतेय; फोन नवा असणार, पण पार्ट जुने... 
16
परकीय गुंतवणूकीच्या आघाडीवर सरकारचा मोठा निर्णय, चीन-पाकिस्तानसह अनेक देशांवर होणार परिणाम
17
Rani Baug: "राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लांचं नाव बदलता येणार नाही", प्रशासनाकडून स्पष्टीकरण
18
तडकाफडकी ठाकरे गटातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
IPL 2025 चॅम्पियन RCB चा 'खुली बस परेड' प्लॅन फिस्कटला; या गोष्टीची भीती ठरलं त्यामागचं कारण
20
PF च्या ७ लाखांच्या विम्यासाठी UAN-आधार लिंक अनिवार्य; सक्रीय करण्यासाठी 'इतके' दिवस बाकी!

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, नंतर दोन महिने थांबावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनाची लस घेतल्यानंतर स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांना दोन महिने थांबावे लागणार आहे. आयसीएमआरने यासंदर्भातील एक पत्रच जिल्ह्यातील ...

नंदुरबार : कोरोनाची लस घेतल्यानंतर स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांना दोन महिने थांबावे लागणार आहे. आयसीएमआरने यासंदर्भातील एक पत्रच जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना दिले आहे. यातून रक्तदात्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व जनकल्याण अशा दोन रक्तपेढ्या आहेत. या ठिकाणाहून गरजवंतांना तातडीने रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. कोरोनाकाळात या ठिकाणाहून रक्तपुरवठा करण्यात अडचणी आल्याचे दिसून आले होते. सध्या सुरू असलेल्या कोरोना लसीकरण काळातही हीच स्थिती आहे. रक्त संकलन कमी झाले असल्याने चिंता वाढल्या आहेत. यातच लसीचा पहिला डोस घेतल्यावर २८ तर दुसरा डोस घेतल्यावर २८ दिवस रक्तदान करणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्याने ही टंचाई वाढण्याची भीती आहे. यामुळे कोरोना लसीकरणापूर्वी अनेक जण रक्तदान करून घेण्यासाठी रक्तपेढ्या गाठत आहेत.

कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन ही लस घेतल्यानंतर संबधितांना ताप येणे किंवा इतर तत्सम लक्षणे दिसून येतात. अशा काळात रक्तदान करणे धोकादायक ठरू शकते. अशक्तपणा येण्याची दाट शक्यता असल्याने पहिल्या व दुसऱ्या डोसनंतर ठरावीक काळाने लस घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

रक्तदान करण्यासाठी उत्सुक असलेल्यांनी लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे सूचित करण्यात आले आहे. याबाबत विशेष अशा सूचना रक्तपेढ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कामकाज करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. अनेक जण लस घेण्याआधी संपर्क करत असल्याची माहिती आहे.

लस घेण्याआधी केले रक्तदान

कोरोना लस घेण्यापूर्वी रक्तदान केले आहे. इतरांनीही याच प्रकारे रक्तदान केल्यास रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा होणार आहे. यातून गरजूंना रक्त देण्याची वेळ आल्यास ती तातडीने पूर्ण करण्यात येईल. कोरोना लस घेणे आणि रक्तदान याबाबत सोशल मीडियात काही गैरसमज आहेत. नागरिकांनी त्याकडे लक्ष न देता, तज्ज्ञांचा सल्ला घेत लस घ्यावी, ही अपेक्षा आहे.

- मोहन सूर्यवंशी, रक्तदाता, नंदुरबार

रक्तदान करण्यासाठी नियमित येणारे रक्तदाते संपर्कात आहेत. ४५ पूर्ण केलेले अनेक जण लस घेणार आहेत. तत्पूर्वी एकदोघांनीच रक्तदान केले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी योग्य पद्धतीने लस घ्यावी.

- डाॅ. के.डी. सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

लस घेतल्यानंतरचा अशक्तपणा हा व्यक्तीच्या प्रकृतीवर परिणाम करणारा आहे. यामुळे लस घेतल्यानंतर रक्तदान कधी करावे याबाबत रुग्णांना वेळोवेळी सल्ले देत आहोत. रक्तपेढीच्या संचालकांसोबत बोलून नागरिकांना माहिती देत आहोत.

- डाॅ. राजेश वळवी,

अध्यक्ष, माडा, नंदुरबार