शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

कोरोना महामारीत जिल्ह्याचा जन्मदर काहीअंशी झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात ७५४ जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा तीन टक्क्यांवर पोहोचला आहे, ...

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात ७५४ जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा तीन टक्क्यांवर पोहोचला आहे, तर दुसरीकडे जिल्ह्याचा २१ टक्के असलेला जन्मदर हा १९ टक्क्यांवर आला आहे.

जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये काेरोनाचा शिरकाव झाला होता. यातून सुरू झालेले लाॅकडाऊन अनेक बाबींमुळे त्रासदायकही ठरले. यात प्रामुख्याने नोकरी जाणे, कोरोना आजार होण्याचा मानसिक तणाव, वाढीव खर्च यामुळे अनेकांनी फॅमिली प्लॅनिंग करत मूल उशिरा जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील विवाहसोहळे पुढे ढकलेले गेले. याचा परिणाम थेट जिल्ह्यातील जन्मदरावर झाला आहे. २०२०-२०२१ या वर्षात चार हजार २८९ बालकांनी जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये जन्म घेतला, तर कोरोनासह विविध आजारांनी सुमारे साडेसहा हजारपेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा मृत्युदर हा तीन टक्क्यांवर आला आहे. कोरोनामुळे कमी झालेला जन्मदर चिंतेची बाबही आहे.

विवाहसोहळे घटले

कोरोनापूर्वी जिल्ह्यात वर्षाला साधारण अडीच ते तीन हजारपेक्षा अधिक विवाहसोहळे होत होते. छोट्या-मोठ्या प्रमाणात होणारे हे साेहळे कोरोना संसर्गाच्या भीतीने कमी झाले आहेत. कारवाईच्या भीतीने अनेकजण घरगुती पद्धतीने विवाह करत आहेत, तर काहींनी उपवर मुलामुलींची विवाह काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय नाइलाजाने घेतला आहे.

जन्मदर घटला

२१.१ जन्मदर असलेल्या नंदुरबार जिल्ह्याचा जन्मदर यंदाच्या वर्षात १९ टक्के झाल्याचे सांगण्यात आले आहे. यातून कोरोना महामारीचे दुष्परिणाम गंभीर असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक केंद्रांकडून विविध सोयी गर्भवती मातांसाठी झाल्या आहेत.