शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश प्रक्रियेत जिल्हा सर्वाधिक उदासिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 20:24 IST

आरटीई : प्रवेश मुदत संपण्यास दोन दिवस उरले तरी केवळ ७८ विद्यार्थी प्रवेशित

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खाजगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश योजना म्हणजेच आरटीईअंतर्गंत प्रवेश प्रक्रियेत नंदुरबार जिल्हा राज्यात सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे वृत्त आहे़ प्रवेश प्रक्रियेला अवघे काही तास शिल्लक असताना केवळ ७८ विद्यार्थ्यांचीच प्रवेश निश्चिती झालेली आहे़शिक्षक हक्क कायद्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश परीक्षा २०१९-२०२० राबविण्यात येत आहे़ यांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ४७ शाळांमार्फत ४७० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ यासाठी जिल्हाभरातून एकूण ५७३ अर्ज दाखल करण्यात आले होते़ त्यानंतर ८ एप्रिल रोजी पुणे येथे काढण्यात आलेल्या पहिल्या सोडतीमध्ये प्रवेशासाठी १४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती़दरम्यान, यापैकी आतापर्यंत केवळ ७८ विद्यार्थ्यांचीच प्रवेश निश्चिती झालेली आहे़ प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवातीला २८ एप्रिलपर्यंत अंतीम मुदत देण्यात आली होती़ परंतु प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याबाबत पालक तसेच विविध संघटनांकडून दबाव वाढू लागल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी ४ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली़ त्यानंतर शिक्षण विभागाकडून १० मेपर्यंत पुन्हा मुदवाढ देण्यात आलेली आहे़ परंतु तरीदेखील नंदुरबारात अगदी कासवगतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने यंदाही सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार प्रवेश प्रक्रियेत पिछाडीवरच राहतोय की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़इतर जिल्ह्यांचा विचार करता, जळगावात १४१ शाळांमार्फ त १ हजार ४३ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ आतापर्यंत २ हजार ७२६ आॅनलाईन अर्ज करण्यात आले आहे़ पैकी ७६६ विद्यार्थ्यांची निवड होऊन ६०५ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झालेली आहे़ धुळ्यात ९७ शाळांमार्फत १ हजार २३७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ यासाठी २ हजार ३५५ अर्ज दाखल करण्यात आले आहे़निवड झालेल्या ८१० विद्यार्थ्यांपैकी ५९२ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झाली आहे़ नाशिकमध्ये ४५७ शाळांमार्फत ५ हजार ७३५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून एकूण १४ हजार ५०८ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ पैकी, ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून २ हजार ४१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ तसेच आदिवासी जिल्हे म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली येथेही ८२ शाळांमार्फत ७८४ जागांसाठी १ हजार २६६ अर्ज दाखल करण्यात आले होते़ त्यासाठी ५१० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती़यापैकी २९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ पालघर येथे २२२ शाळांमार्फत ४ हजार २५२ जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत केवळ १ हजार ३२४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ ३८८ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली असून प्रत्यक्षात केवळ २९४ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झालेली आहे़ त्यामुळे इतर आदिवासी जिल्ह्यांच्या तुलनेतदेखील आकडेवारीनुसार नंदुरबार जिल्हा पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे़मागील वर्षी आरटीईअंतर्गत जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाला चार प्रवेश फेºया घेण्याची वेळ आली होती़तरीदेखील मागील वर्षी एकूण १३७ आरटीईच्या जागा शिल्लक होत्या़ तेच आताही होतय की काय अशी भिती शिक्षण विभागाकडून व्यक्त केली जात आहे़ आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाकडून वारंवार वेळापत्रकात बदल, तारखांचा घोळ आदी सावळा गोंधळ या आधीच झालेला आहे़ तसेच आरटीई प्रवेशासाठी अनेकांकडून लॉबिंगदेखील सुरु असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़दरम्यान, अजून निम्म्याहून अधिक आरटीईच्या जागा रिक्त असल्याने यंदाही अनेक प्रवेश फेºया होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली़