शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

कोठली खुर्द येथे रेशन व भाजीपाला वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोठली खुर्द गावातील लाभार्थ्यांना रेशन व भाजीपालाचे वाटप जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोठली खुर्द गावातील लाभार्थ्यांना रेशन व भाजीपालाचे वाटप जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि प्रांतधिकारी वसुमना पंत यांच्याहस्ते वाटप करण्यात आले़ यावेळी लाभार्थींना कोरोना संदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्यात आली़प्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश वळवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ जे़आऱतडवी, पंचायत समिती सदस्य दिनेश वळवी, ग्रामपंचायत सदस्य विलास शेगजी वळवी, बालाजी संजय वळवी, पोलिस पाटील प्रल्हाद जगन्नाथ पाटील ग्रामसेवक आऱडी़पवार,पोलीस पाटील प्रल्हाद जगन्नाथ पाटील, चंद्रकांत अनिल वळवी, लक्ष्मण नरभवर, कृष्णा वसावे, शांतीलाल मगन पाटील, डॉ़ धीरूभाई पाटील, अशोक प्रेमसिंग नाईक, अतुल गावीत यांच्यासह नागरिक उपस्थित होते़ कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम १४४ नुसार संचारबंदी संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ ह्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने प्रशासनाकडून ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तू गहू, साखर, डाळ-तांदूळ रेशनचे साहित्य आणि भाजीपाला या सर्व गोष्टींचे वाटप कोठली खुर्द ग्रामपंचायती घेण्यात आला़ गावातील १ हजार १०० लाभार्थींना ३ रुपये किलो प्रमाणे तांदूळ, २ रुपये किलो प्रमाणे गहू, २० रुपये दराने साखर यासह कोठली गावातील दात्यांकडून भाजीपाला टमाटे, कारले, मका या भाजीपाल्याचे वितरण करण्यात आले़गावात सुमारे २ क्विंटल भाजीपाला आणि १ हजार १०० लाभार्थींना ८० क्विंटल तांदूळ, ५५ किलो गहू आणि दीड क्विंटल साखरेचे वाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिक वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याहस्ते करण्यात आले़ कार्यक्रमात सहभागी ग्रामस्थांना एक मीटर अंतराची रेषा आखून देण्यात आली होती़ त्यानुसार गर्दी न करता वितरण करण्यात आले़दरम्यान गुजर समाज आणि व्हीजेएमटीतर्फे संपुर्ण नंदूरबार जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात माहिती देणारा जनजागृती रथ फिरवण्यात येत आहे़ या रथाची माहिती यावेळी देण्यात आले़ मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सांगितले की, अंगणवाडींतर्गत लाभार्थींना अमृत आहार योजनेंतर्गत घरपोच पोषण आहार पोहोचवला जाणार आहे़ कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य, विभाग, तलाठी, ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना शासनाकडून ५० लाख रुपयांच विशेष विमासुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे़ यामुळे त्यांना आधार मिळाला आहे़