शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोठली खुर्द येथे रेशन व भाजीपाला वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोठली खुर्द गावातील लाभार्थ्यांना रेशन व भाजीपालाचे वाटप जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोठली खुर्द गावातील लाभार्थ्यांना रेशन व भाजीपालाचे वाटप जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि प्रांतधिकारी वसुमना पंत यांच्याहस्ते वाटप करण्यात आले़ यावेळी लाभार्थींना कोरोना संदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्यात आली़प्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश वळवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ जे़आऱतडवी, पंचायत समिती सदस्य दिनेश वळवी, ग्रामपंचायत सदस्य विलास शेगजी वळवी, बालाजी संजय वळवी, पोलिस पाटील प्रल्हाद जगन्नाथ पाटील ग्रामसेवक आऱडी़पवार,पोलीस पाटील प्रल्हाद जगन्नाथ पाटील, चंद्रकांत अनिल वळवी, लक्ष्मण नरभवर, कृष्णा वसावे, शांतीलाल मगन पाटील, डॉ़ धीरूभाई पाटील, अशोक प्रेमसिंग नाईक, अतुल गावीत यांच्यासह नागरिक उपस्थित होते़ कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम १४४ नुसार संचारबंदी संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ ह्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने प्रशासनाकडून ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तू गहू, साखर, डाळ-तांदूळ रेशनचे साहित्य आणि भाजीपाला या सर्व गोष्टींचे वाटप कोठली खुर्द ग्रामपंचायती घेण्यात आला़ गावातील १ हजार १०० लाभार्थींना ३ रुपये किलो प्रमाणे तांदूळ, २ रुपये किलो प्रमाणे गहू, २० रुपये दराने साखर यासह कोठली गावातील दात्यांकडून भाजीपाला टमाटे, कारले, मका या भाजीपाल्याचे वितरण करण्यात आले़गावात सुमारे २ क्विंटल भाजीपाला आणि १ हजार १०० लाभार्थींना ८० क्विंटल तांदूळ, ५५ किलो गहू आणि दीड क्विंटल साखरेचे वाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिक वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याहस्ते करण्यात आले़ कार्यक्रमात सहभागी ग्रामस्थांना एक मीटर अंतराची रेषा आखून देण्यात आली होती़ त्यानुसार गर्दी न करता वितरण करण्यात आले़दरम्यान गुजर समाज आणि व्हीजेएमटीतर्फे संपुर्ण नंदूरबार जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात माहिती देणारा जनजागृती रथ फिरवण्यात येत आहे़ या रथाची माहिती यावेळी देण्यात आले़ मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सांगितले की, अंगणवाडींतर्गत लाभार्थींना अमृत आहार योजनेंतर्गत घरपोच पोषण आहार पोहोचवला जाणार आहे़ कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य, विभाग, तलाठी, ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना शासनाकडून ५० लाख रुपयांच विशेष विमासुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे़ यामुळे त्यांना आधार मिळाला आहे़