शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कोठली खुर्द येथे रेशन व भाजीपाला वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोठली खुर्द गावातील लाभार्थ्यांना रेशन व भाजीपालाचे वाटप जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोठली खुर्द गावातील लाभार्थ्यांना रेशन व भाजीपालाचे वाटप जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि प्रांतधिकारी वसुमना पंत यांच्याहस्ते वाटप करण्यात आले़ यावेळी लाभार्थींना कोरोना संदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्यात आली़प्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश वळवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ जे़आऱतडवी, पंचायत समिती सदस्य दिनेश वळवी, ग्रामपंचायत सदस्य विलास शेगजी वळवी, बालाजी संजय वळवी, पोलिस पाटील प्रल्हाद जगन्नाथ पाटील ग्रामसेवक आऱडी़पवार,पोलीस पाटील प्रल्हाद जगन्नाथ पाटील, चंद्रकांत अनिल वळवी, लक्ष्मण नरभवर, कृष्णा वसावे, शांतीलाल मगन पाटील, डॉ़ धीरूभाई पाटील, अशोक प्रेमसिंग नाईक, अतुल गावीत यांच्यासह नागरिक उपस्थित होते़ कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम १४४ नुसार संचारबंदी संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ ह्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने प्रशासनाकडून ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तू गहू, साखर, डाळ-तांदूळ रेशनचे साहित्य आणि भाजीपाला या सर्व गोष्टींचे वाटप कोठली खुर्द ग्रामपंचायती घेण्यात आला़ गावातील १ हजार १०० लाभार्थींना ३ रुपये किलो प्रमाणे तांदूळ, २ रुपये किलो प्रमाणे गहू, २० रुपये दराने साखर यासह कोठली गावातील दात्यांकडून भाजीपाला टमाटे, कारले, मका या भाजीपाल्याचे वितरण करण्यात आले़गावात सुमारे २ क्विंटल भाजीपाला आणि १ हजार १०० लाभार्थींना ८० क्विंटल तांदूळ, ५५ किलो गहू आणि दीड क्विंटल साखरेचे वाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिक वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याहस्ते करण्यात आले़ कार्यक्रमात सहभागी ग्रामस्थांना एक मीटर अंतराची रेषा आखून देण्यात आली होती़ त्यानुसार गर्दी न करता वितरण करण्यात आले़दरम्यान गुजर समाज आणि व्हीजेएमटीतर्फे संपुर्ण नंदूरबार जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात माहिती देणारा जनजागृती रथ फिरवण्यात येत आहे़ या रथाची माहिती यावेळी देण्यात आले़ मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सांगितले की, अंगणवाडींतर्गत लाभार्थींना अमृत आहार योजनेंतर्गत घरपोच पोषण आहार पोहोचवला जाणार आहे़ कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य, विभाग, तलाठी, ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना शासनाकडून ५० लाख रुपयांच विशेष विमासुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे़ यामुळे त्यांना आधार मिळाला आहे़