शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षात भूमिहीनांना ६३१ एकर जमिनीचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील अनुसुचित जाती संवर्गातील भूमिहीन मजूरांना शेती देऊन त्यांचे सबलीकरण व्हावे यासाठी शासनाने दादासाहेब ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील अनुसुचित जाती संवर्गातील भूमिहीन मजूरांना शेती देऊन त्यांचे सबलीकरण व्हावे यासाठी शासनाने दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना सुरू केली आहे़ २००३ पासून सुरू असलेल्या या योजनेत नंदुरबार जिल्ह्यात आजअखेर २६० शेतकऱ्यांना ६३१ एकर शेत जमीन खरेदी करुन देण्यात आली आहे़सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयाकडून जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येत आहे़ यांतर्गत भूमिहीन शेतमजूरांनी गावच्या ग्रामसेवक आणि ग्रामसभेचा ठराव करुन तालुकस्तरीय समितीकडे अर्ज सोपवण्याची पद्धत आहे़ यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अखत्यारित तालुकास्तरीय कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत़ या कमिटींकडून पात्र लाभार्थींना जमिनी खरेदी करुन देण्याचे कामकाज करण्यात येते़ गावनिहाय पात्र असलेल्या एका लाभार्थीला चार एकर कोरडवाहू किंवा २ एकर बागायती शेत जमिन खरेदी करून देण्यात येते़ शासनाच्या रेडीरेकनर दरानुसार जिल्हाधिकारी यांच्यासमोर ही खरेदी करुन देण्याबाबत चर्चा होते़ परंतु पाच लाखाच्या आत असलेल्या दरांमुळे शेतकरी योजनेत जमिनी विक्री करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे़ यातून गेल्या काही वर्षात योजनेत समाविष्ट होणाºया लाभार्थींची संख्या कमी झाली आहे़ पात्र मजूरांच्या म्हणण्यानुसार खडकाळ आणि खारट जमिनींची विक्री करण्यावरच शेतकरी भर देण्यात येतो़ यामुळे १६ वर्षांच्या दीर्घ कालावधीतही योजनेत केवळ २६० लाभार्थी समाविष्ट होवू शकले आहेत़लाभार्थी हा भूमिहीन असला पाहिजे ही या योजनेची पहिली आणि महत्त्वपूर्ण अट आहे़ याची पडताळणी करण्यासाठी गावनिहाय याद्या हरकती घेण्यासाठी लावल्या जात आहेत़ यातून बोगस लाभार्थी कमी होवून ज्यांना गरज आहे़ त्यांना जमिनी मिळू शकतील असा दावा समाजकल्याण विभागाचा आहे़

२००३ ते २०१८ या वर्षात २६० शेतकऱ्यांना १५८ एकर बागायती आणि ४७३ एकर कोरडवाहू जमिनीचे वितरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ २०१९ मध्ये लोकसभा, विधानसभा आणि शेवटी जिल्हा परिषद निवडणूकांच्या आचारसंहितेमुळे योजनेचे काम रखडले होते़ यातून एकाही लाभार्थीला न्याय मिळू शकलेला नाही़ यंदाच्या वर्षात मार्चपासून कोरोना सुरू असल्याने योजना थंडबस्त्यात आहे़ परंतु तालुकास्तरावर अर्ज आलेले असल्याने त्यांची लाभार्थी निवड प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाकडून देण्यात आले आहेत़ यानुसार कामाकज होवून येत्या सहा महिन्यात लाभार्थींना जमिनी खरेदी करुन दिल्या जातील अशी अपेक्षा आहे़ जिल्ह्यातील अनुसुचित जाती संवर्गातील १०० टक्के भूमिहीन मजूरांपर्यंत योजना पोहोचावी यासाठी कामकाज सुरू आहे़

राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात योजनेचे कामकाज सुरू आहे़ प्रांताधिकाऱ्यांकडून तालुका समित्यांना देण्यात आलेल्या आदेशानंतर यंदा लाभार्थी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे़ ग्रामपंचायती आणि ग्रामसेवक यांच्याकडून तशी माहिती समित्यांनी घेतली आहे़ येत्या काळात लाभार्थींना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळणार आहेत़-राकेश महाजन, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नंदुरबाऱ