शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

१६ वर्षात भूमिहीनांना ६३१ एकर जमिनीचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील अनुसुचित जाती संवर्गातील भूमिहीन मजूरांना शेती देऊन त्यांचे सबलीकरण व्हावे यासाठी शासनाने दादासाहेब ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील अनुसुचित जाती संवर्गातील भूमिहीन मजूरांना शेती देऊन त्यांचे सबलीकरण व्हावे यासाठी शासनाने दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना सुरू केली आहे़ २००३ पासून सुरू असलेल्या या योजनेत नंदुरबार जिल्ह्यात आजअखेर २६० शेतकऱ्यांना ६३१ एकर शेत जमीन खरेदी करुन देण्यात आली आहे़सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयाकडून जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येत आहे़ यांतर्गत भूमिहीन शेतमजूरांनी गावच्या ग्रामसेवक आणि ग्रामसभेचा ठराव करुन तालुकस्तरीय समितीकडे अर्ज सोपवण्याची पद्धत आहे़ यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अखत्यारित तालुकास्तरीय कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत़ या कमिटींकडून पात्र लाभार्थींना जमिनी खरेदी करुन देण्याचे कामकाज करण्यात येते़ गावनिहाय पात्र असलेल्या एका लाभार्थीला चार एकर कोरडवाहू किंवा २ एकर बागायती शेत जमिन खरेदी करून देण्यात येते़ शासनाच्या रेडीरेकनर दरानुसार जिल्हाधिकारी यांच्यासमोर ही खरेदी करुन देण्याबाबत चर्चा होते़ परंतु पाच लाखाच्या आत असलेल्या दरांमुळे शेतकरी योजनेत जमिनी विक्री करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे़ यातून गेल्या काही वर्षात योजनेत समाविष्ट होणाºया लाभार्थींची संख्या कमी झाली आहे़ पात्र मजूरांच्या म्हणण्यानुसार खडकाळ आणि खारट जमिनींची विक्री करण्यावरच शेतकरी भर देण्यात येतो़ यामुळे १६ वर्षांच्या दीर्घ कालावधीतही योजनेत केवळ २६० लाभार्थी समाविष्ट होवू शकले आहेत़लाभार्थी हा भूमिहीन असला पाहिजे ही या योजनेची पहिली आणि महत्त्वपूर्ण अट आहे़ याची पडताळणी करण्यासाठी गावनिहाय याद्या हरकती घेण्यासाठी लावल्या जात आहेत़ यातून बोगस लाभार्थी कमी होवून ज्यांना गरज आहे़ त्यांना जमिनी मिळू शकतील असा दावा समाजकल्याण विभागाचा आहे़

२००३ ते २०१८ या वर्षात २६० शेतकऱ्यांना १५८ एकर बागायती आणि ४७३ एकर कोरडवाहू जमिनीचे वितरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ २०१९ मध्ये लोकसभा, विधानसभा आणि शेवटी जिल्हा परिषद निवडणूकांच्या आचारसंहितेमुळे योजनेचे काम रखडले होते़ यातून एकाही लाभार्थीला न्याय मिळू शकलेला नाही़ यंदाच्या वर्षात मार्चपासून कोरोना सुरू असल्याने योजना थंडबस्त्यात आहे़ परंतु तालुकास्तरावर अर्ज आलेले असल्याने त्यांची लाभार्थी निवड प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाकडून देण्यात आले आहेत़ यानुसार कामाकज होवून येत्या सहा महिन्यात लाभार्थींना जमिनी खरेदी करुन दिल्या जातील अशी अपेक्षा आहे़ जिल्ह्यातील अनुसुचित जाती संवर्गातील १०० टक्के भूमिहीन मजूरांपर्यंत योजना पोहोचावी यासाठी कामकाज सुरू आहे़

राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात योजनेचे कामकाज सुरू आहे़ प्रांताधिकाऱ्यांकडून तालुका समित्यांना देण्यात आलेल्या आदेशानंतर यंदा लाभार्थी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे़ ग्रामपंचायती आणि ग्रामसेवक यांच्याकडून तशी माहिती समित्यांनी घेतली आहे़ येत्या काळात लाभार्थींना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळणार आहेत़-राकेश महाजन, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नंदुरबाऱ