शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

सूर्यग्रहणसाठी तीन हजार सौर चष्मे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : यंदा २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार असून ते भारताच्या विविध भागातून दिसणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : यंदा २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार असून ते भारताच्या विविध भागातून दिसणार आहे. यात साधारण ८५ टक्के सूर्याचा भाग झाकला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी अंनिसतर्फे जिल्ह्यात तीन हजार चष्मे वाटप करण्यात आले आहे.वर्षभरात पृथ्वीच्या पाठीवरुन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन किंवा जास्तीत जास्त पाच सूर्यग्रहणे होतांना दिसून येतात. हे ग्रहण खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती या तीन प्रकारांपैकी कोणतीही असू शकतात. त्यात यंदाचे ग्रहण हे कंकणाकृती आहेत. परंतु नंदुरबार जिल्ह्यात खंडग्रास स्थितीत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत सूर्यग्रहणाबाबत अंधश्रद्धा निर्माण होऊ नये, समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे राज्यभरात प्रबोधन मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अंनिसतर्फे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये तीन हजार सौर चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सौर चष्म्याचा वापर करून विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण पाहता येणार आहे. आज होणारे सूर्यग्रहण काही ठिकाणी कंकणाकृती तर काही ठिकाणी खंडग्रास स्वरूपामध्ये दिसणार आहे.आपल्या जिल्ह्यातही ते खंडग्रास स्वरूपामध्ये दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सूर्यग्रहण लागण्याची वेळ सकाळी ८.०० असून सुटण्याची वेळ ११.३० आहे. जास्तीत जास्त खंडग्रास स्थितीची वेळ ९.३० राहणार आहे. खंडग्रास स्थितीमध्ये सूयार्चा जवळपास ८२ टक्के भाग झाकला जाणार आहे.यंदाचे कंकणाकृती सूर्यग्रहण सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुरू होणार असून डिसेंबर महिना हा थंडीचा महिना असल्याने या ग्रहणाचा खोगोलशास्त्राच्या अभ्यासकांसह अनेक नागरिक याचा आनंद घेणार आहे. हे ग्रहण पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात काही संस्था, संघटनांमार्फत ग्रहण दर्शनाचा उपक्रम देखील अयोजित करण्यात आले आहे. यंदाचे कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसणार असल्याने आपल्यासाठी एक पर्वणीच आहे.डोळे हा आपल्या शरिराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे साध्या डोळ्यांनी सूर्यग्रहण न पाहता आवश्यक त्या साधनांचा वापर झाला पाहिजे. उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास अंधत्व किंवा डोळ्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी डोळ्यांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ञांमार्फत म्हटले जात आहे. यासाठी विविध संस्थांमार्फत ग्रहण दर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ग्रहणासाठी सुरक्षेचे साधनेही यांच्याकडून देण्यात येणार आहे.