शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

जि. प. व पं. स. उमेदवारांमध्ये बदल होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST

नंदुरबार : ओबीस आरक्षणामुळे सदस्यत्व रद्द झालेल्या उमेदवारांनाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा खुद उमेदवारांमध्येच व्यक्त होत असताना काही राजकीय ...

नंदुरबार : ओबीस आरक्षणामुळे सदस्यत्व रद्द झालेल्या उमेदवारांनाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा खुद उमेदवारांमध्येच व्यक्त होत असताना काही राजकीय पक्षांनी उमेदवार बदलण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक होणार की नाही? याबाबत संभ्रमावस्था कायम असून, निवडणूक आयोग मंगळवारी (दि. २९ जून) अध्यादेश काढतो किंवा नाही? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

जिल्हा परिषदेच्या ११ गट व तीन पंचायत समितीच्या १४ गणांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. त्यासाठी २९ जूनला अध्यादेश काढण्यात येणार असून, त्याच दिवसांपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणुकीच्या प्रशासकीय बाबींची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांनीदेखील आपल्या परीने तयारीला वेग दिला आहे.

सदस्यत्व रद्द झालेल्या ११ जि. प. गटापैकी सात सदस्य हे भाजपचे, तर प्रत्येकी दोन सदस्य हे काँग्रेस व शिवसेनेचे आहेत. त्यामुळे भाजपला उमेदवार देताना मोठी कसरत करावी लागणार आहे. सातही ठिकाणी आहे त्याच सदस्यांना उमेदवारी दिली जाईल असे बोलले जात असले तरी काही उमेदवार निवडणुकीचा खर्च करण्याची आपली क्षमता नसल्याचे सांगून पक्षानेच तो खर्च करावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांबाबत पक्ष विचार करणार आहे. काँग्रेसचे व शिवसेनेचे जे दोन सदस्य आहेत त्यात दोन्ही दिग्गज आहेत.

अशीच गत ही पंचायत समिती गणातील उमेदवारांची राहणार आहे. त्यामुळे उमेदवारी सदस्यत्व रद्द झालेल्या उमेदवारांनाच मिळते किंवा कशी याकडे आता लक्ष लागून आहे.

दरम्यान, सर्वच पक्षांनी इच्छुकांकडून उमेदवारीसाठी अर्ज मागविले आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे चित्र आहे.