शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

टोकन नसणाऱ्यांना आधी लस दिली जात असल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST

शहरातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सद्या दुसऱ्या डोसच्या नागरिकांना लस ...

शहरातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सद्या दुसऱ्या डोसच्या नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र लसीच्या तुडवड्यामुळे नागरिकांना लस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आपला डोस चुकू नये म्हणून लस घेणाऱ्या नागरिकांची केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. एवढेच नव्हे येथील केंद्र सकाळी नऊ वाजता सुरू होत असताना नागरीक सकाळी आठ वाजल्यापासूनच येत असतात.

शुक्रवारी दुपारी केंद्रावर ज्यांच्याकडे लसीचे टोकन नव्हती अशांना मागच्या दरवाजाने आता प्रवेश देवून लस दिली जात होती. त्यामुळे अधिकृत टोकन असलेल्या नागरिकांनी त्यास मज्जाव केला होता. या प्रकारामुळे चांगलाच वाद रंगला होता. यामुळे प्रचंड गोंधळ देखील उडाला होता. वातावरणही चांगलेच तणावपूर्ण बनले होते. शेवटी रूग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी घटना स्थळी दाखल होवून टोकन नसलेल्यांना बाहेर काढले. त्यानंतर उर्वरित लोकांचे शांततेत लसीकरण करण्यात आले. या केंद्रावर लसींचा प्रचंड तुटवडा भासत असल्यामुळे असे चित्र निर्माण होत आहे. तथापि केंद्रावर नियोजनाचा अभावदेखील दिसून आला आहे. कारण नागरिकांना बसण्यास पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे सर्वच एका ठिकाणी गोळा झाले होते. विशेषत: महिलांना देखील जागा अभावी पुरूषांच्या घोळक्यातच उभे राहावे लागल्याचे चित्र होते. अशावेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. लसीकरणा दरम्यान तेथे कोणीही जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे केंद्रावर सावळा गोंधळ दिसून आला होता. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून प्रभावी नियोजनाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे.

केंद्रावरील बंदोबस्ताबाबत पोलिसांची उदासीनता

तळोदा शहरातील नागरिकांना लसिकरणासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात केंद्र उभारण्यात आले आहे. ४० हजाराच्या लोकसंख्येसाठी केवळ एकच केंद्र दिले असल्यामुळे साहजिकच नागरिकांची गर्दी देखील वाढत असते. परिणामी मोठा गोंधळ देखील उडत असतो. या गोंधळात लसीच्या तुटवड्याने अधिक भर घातली आहे. वास्तविक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेवून निदान लसीकरण दरम्यान तरी पोलिसांचा बंदोबस्त लावण्याची आवश्यकता आहे. मात्र, तसे दिसून आले नाही. येथील पोलीस बंदोबस्तासंदर्भात उपस्थित कर्मचाऱ्यास विचारले असता प्रशासनाने पोलीस बंदोबस्तासाठी दोन वेळा पोलीस ठाण्यात पत्र दिले आहे. परंतु अजूनही त्या पत्रावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. या वेळी पोलिसांनी बंदोबस्ताबाबत उदासीन भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांना शिस्तीने उभे राहण्याचा सूचना कर्मचारी देत असतात. परंतु त्यांचे कोणीच ऐकत नाही,अशी व्यथादेखील या कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या वृध्द व महिलांची सुरक्षितता लक्षात घेवून येथे कायम स्वरूपी पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.