शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

उनपदेव पर्यटनस्थळाकडे दुर्लक्षामुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 22:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा पर्वत रांगेत, दरा धरणाशेजारी निसर्गरम्य वातावरणातील व पर्यटकांचे आकर्षणाचे मुख्य केंद्र असलेले निसर्गनिर्मित ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा पर्वत रांगेत, दरा धरणाशेजारी निसर्गरम्य वातावरणातील व पर्यटकांचे आकर्षणाचे मुख्य केंद्र असलेले निसर्गनिर्मित गरम पाण्याचा झरा म्हणून प्रसिद्ध असलेले उनपदेव ता.शहादा या धार्मिक व पर्यटनस्थळाची दुरवस्था झाली असून पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिकांसह पर्यटकांनी व्यक्त केली आहे.गेल्या अनेक वर्षापासून औषधी गुणधर्म असलेल्या व नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असलेल्या उनपदेव, ता.शहादा या पर्यटनस्थळाची दुरवस्था झाल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे . श्रावण महिन्यात अनेक भाविक येथे येतात. धार्मिक उपक्रम राबवितात तर येथील गरम पाण्यात गंधकाचा समावेश असल्याने व हे पाणी नैसर्गिकरितीने भूगर्भातून गरम स्वरूपात येत असल्याने या पाण्यामुळे अनेक दुुुर्धर चर्मरोग बरे झाले असल्याने सर्वांचेच आकर्षण असलेल्या या पर्यटनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने येथे येणाºया महिला भाविक व पर्यटकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.२००६ व २०१७ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे वाकी नदीला महापूर आला. या महापुरात उनपदेव संपूर्ण उद्ध्वस्त झाले. पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या येथील मूलभूत सुविधा नेस्तानाबूत झाल्या. गरम पाण्यावरील गोमुख, स्वच्छतागृह, पर्यटकांसाठी कपडे बदलण्यासाठी असलेले प्रसाधन गृह, नदी ओलांडून जाण्यासाठी निर्माण करण्यात आलेले साकव, रस्ते व विविध विकास कामे उद्ध्वस्त झाली होती. अगदी गरम पाण्याचा झरासुध्दा नष्ट झाला होता. महापुराच्या काही कालावधीनंतर स्थानिक ग्रामस्थ व हौशी पर्यटकांनी या भागात भेट देवून परिस्थितीची पाहणी केली व गरम पाण्याचा झरा शोधला. स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने तात्पुती उपाययोजना करुन गरम पाण्याचा प्रवाह जीवंत ठेवण्यात यश मिळविले होते.मात्र यानंतर जिल्हा परिषद, वनविभाग व स्थानिक प्रशासनाने कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी येथे येणाºया पर्यटकांना कुठलीही मुलभूत सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवली आहे. मध्यंतरीच्या काळात राणीपूर, ता.शहादा वनविभागामार्फत येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली. आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या अर्धाकृती पुतळ्यासह विविध वनौषधींची बाग निर्माण करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी पॅगोडाची निर्मिती करण्यात आली तर बालकांसाठी बागेतच विविध खेळणी ठेवण्यात आली होती त्याचीही आता दुरवस्था झाली आहे. संरक्षणासाठी करण्यात आलेले सिमेंटच्या खांबाचे तारेचे कुंपणही तुटून गेले आहेत. तर वनविभागाने निर्माण केलेला दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता हा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशा अवस्थेत आहे. तीव्र चढ-उतार असल्याने या रस्त्यावरुन मार्गक्रमण करताना पर्यटक व वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या सर्व सुविधांचीही पुनर्निमिती करणे आवश्यक आहे.पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्यासह जिल्हा परिषद प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या धार्मिक, निसर्गरम्य व आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या पर्यटनस्थळाकडे विशेष बाब म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यटन खात्यामार्फत येथे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आंघोळीसाठी व्यवस्था, प्रसाधन गृह, विश्रांती कक्ष, रस्ता, उद्यानाची निर्मिती व नदी ओलांडून जाण्यासाठी नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे .