शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

पेट्रोल पाईपलाईनच्या बंद कामाचा निघेना तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : इंडियन आॅईल कंपनी व शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यावर तोडगा काढण्यसाठी प्रशासनामार्फत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : इंडियन आॅईल कंपनी व शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यावर तोडगा काढण्यसाठी प्रशासनामार्फत कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हरकती डावलून कंपनीने काम सुरू केल्याचा आरोप करीत कामच बंद पाडले, परंतु त्यावर पुढे कुठलाही निर्णय, चर्चा अथवा कार्यवाही झाली नसल्याने अद्याप याचा तोडगा निघाला नाही.नवापूर तालुक्यातून जाणाºया प्रस्तावित पेट्रोलियम पाईपलाईनचे काम गुजरातपाठोपाठ नवापूर भागातही सुरु करण्यात आले होते. परंतु शेतकºयांना जमिनीचा अपेक्षित मोबदला दिला नाही, या लाईनमुळे शेतांना आग लागून नुकसान होण्याची शक्यता असे काही मुद्दे उपस्थित करीत या कामालाच विरोध केला. यावर तोडगा काढण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी महसुल विभागाने आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, इंडियन आॅईल कंपनीचे अधिकारी व यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी शेतकºयांच्या शेतातील उभे पीक कापून इंडियन आॅइल कंपनीमार्फत अनधिकृतपणे पाईप लाईनचे काम केले जात असल्याचे आरोप करण्यात आले होते. शेतकºयांच्या जल, जंगल व जमीनीच्या मूळ हक्कावर गदा आणली जात असून या कामाला शेतकºयांच्या हरकती असतांना शेतकºयांना विश्वासात न घेता कंपनी आमच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोपही करण्यात आले होते. कंपनी आमच्या जमिनीवर इतर हक्क प्रस्थापित करु पाहत आहे, परंतु हे आम्ही कदापी होऊ देणार नसल्याची भूमिका उपस्थित शेकडो शेतकºयांनी केला.तर हे काम त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा संतप्त शेतकरी टोकाची भूमिका घेत विरोध करतील, असा इशाराही त्यावेळी देण्यात आला होता. शिवाय वेळप्रसंगी हक्कासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका शेतकºयांनी घेतल्याने या बैठकीत हे काम बंद ठेवण्याचा निर्णय नवापूर तहसिलदार सुनिता जºहाड यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. परंतु त्यावर अद्याप कुठलीही चर्चा अथवा निर्णय झाला नसल्यामुळे हे काम बंदच आहे. त्यावर तोडगा निघणे अपेक्षित असतांना कुठलीच चर्चा झाली नाही.पेट्रोलीयम पाईपलाईनचे काम हे काही वर्षांपासून प्रस्तवित होते. त्याला मंजूरी मिळाल्याने इंडियन आॅईल कंपनीमार्फत नवापूर तालुक्यातून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यासाठी कंपनीमार्फत दोन वर्षांपूर्वीच कार्यवाही सुरू करण्यात आली. परंतू त्यात काही अडथळे निर्माण झाले असून हे दूर करीत काम मार्गी लावण्याची कार्यवाही सुरू झाली असली तरी शेतजमिनीच्या मोबदल्याबाबत समाधान झाले नाही. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला. सद्यस्थितीत हा वाद शिगेला पोहोचला असून शेतकºयांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. परंतु त्यातही तोडगा निघाला नाही. त्यामुळे हे काम तुर्त बंद करण्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले. त्यामुळे शेतकºयांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. त्याला काही कालावधी लोटणार असून पेट्रोलीयम पाईपलाईनचे हे कामही पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.