शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पाईपलाईनच्या बंद कामाचा निघेना तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : इंडियन आॅईल कंपनी व शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यावर तोडगा काढण्यसाठी प्रशासनामार्फत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : इंडियन आॅईल कंपनी व शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यावर तोडगा काढण्यसाठी प्रशासनामार्फत कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हरकती डावलून कंपनीने काम सुरू केल्याचा आरोप करीत कामच बंद पाडले, परंतु त्यावर पुढे कुठलाही निर्णय, चर्चा अथवा कार्यवाही झाली नसल्याने अद्याप याचा तोडगा निघाला नाही.नवापूर तालुक्यातून जाणाºया प्रस्तावित पेट्रोलियम पाईपलाईनचे काम गुजरातपाठोपाठ नवापूर भागातही सुरु करण्यात आले होते. परंतु शेतकºयांना जमिनीचा अपेक्षित मोबदला दिला नाही, या लाईनमुळे शेतांना आग लागून नुकसान होण्याची शक्यता असे काही मुद्दे उपस्थित करीत या कामालाच विरोध केला. यावर तोडगा काढण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी महसुल विभागाने आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, इंडियन आॅईल कंपनीचे अधिकारी व यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी शेतकºयांच्या शेतातील उभे पीक कापून इंडियन आॅइल कंपनीमार्फत अनधिकृतपणे पाईप लाईनचे काम केले जात असल्याचे आरोप करण्यात आले होते. शेतकºयांच्या जल, जंगल व जमीनीच्या मूळ हक्कावर गदा आणली जात असून या कामाला शेतकºयांच्या हरकती असतांना शेतकºयांना विश्वासात न घेता कंपनी आमच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोपही करण्यात आले होते. कंपनी आमच्या जमिनीवर इतर हक्क प्रस्थापित करु पाहत आहे, परंतु हे आम्ही कदापी होऊ देणार नसल्याची भूमिका उपस्थित शेकडो शेतकºयांनी केला.तर हे काम त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा संतप्त शेतकरी टोकाची भूमिका घेत विरोध करतील, असा इशाराही त्यावेळी देण्यात आला होता. शिवाय वेळप्रसंगी हक्कासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका शेतकºयांनी घेतल्याने या बैठकीत हे काम बंद ठेवण्याचा निर्णय नवापूर तहसिलदार सुनिता जºहाड यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. परंतु त्यावर अद्याप कुठलीही चर्चा अथवा निर्णय झाला नसल्यामुळे हे काम बंदच आहे. त्यावर तोडगा निघणे अपेक्षित असतांना कुठलीच चर्चा झाली नाही.पेट्रोलीयम पाईपलाईनचे काम हे काही वर्षांपासून प्रस्तवित होते. त्याला मंजूरी मिळाल्याने इंडियन आॅईल कंपनीमार्फत नवापूर तालुक्यातून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यासाठी कंपनीमार्फत दोन वर्षांपूर्वीच कार्यवाही सुरू करण्यात आली. परंतू त्यात काही अडथळे निर्माण झाले असून हे दूर करीत काम मार्गी लावण्याची कार्यवाही सुरू झाली असली तरी शेतजमिनीच्या मोबदल्याबाबत समाधान झाले नाही. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला. सद्यस्थितीत हा वाद शिगेला पोहोचला असून शेतकºयांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. परंतु त्यातही तोडगा निघाला नाही. त्यामुळे हे काम तुर्त बंद करण्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले. त्यामुळे शेतकºयांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. त्याला काही कालावधी लोटणार असून पेट्रोलीयम पाईपलाईनचे हे कामही पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.