शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी साडेपाच हजार नागरिक दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात साधारण ६०० जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा १.८ टक्के असल्याचे वारंवार ...

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात साधारण ६०० जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा १.८ टक्के असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. परंतु त्यासोबत जिल्ह्यात इतर आजारांनी दगावणाऱ्यांची संख्याही कमी नसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षात साडेपाच हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये काेरोनाचा शिरकाव झाला होता. जुलै २०२० पर्यंत आटोक्यात असलेल्या कोरोनाने वेग पकडत ऑगस्ट महिन्यापासून मृत्यूची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. यातून आजअखेरीस कोरोनामुळे ६३३ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही मृत्यूची ही मालिका सुरुच आहे. कोरोनाचा हाहाकार सुरू असताना विविध आजारांनी मृत होणाऱ्यांची संख्या मात्र मोठी असल्याचे दिसून आले असून वर्षभरात विविध आजारांनी ५ हजार ४९८ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिसारामुळे तीन, क्षयरोगामुळे ६८, श्वसनाच्या विकारांनी २९१, तापजन्य आजाराने ५६, एचआयव्ही २५, कॅन्सर २०६, मेंदूविकाराने १८५, अपघातांमध्ये २४९, आत्महत्या २०१, जनावरांनी चावा घेणे व दंशाने ४२, तीव्ररोगांमुळे ३९९, हृदयविकाराच्या धक्क्याने ८०९ तर जुनाट आजारांनी सर्वाधिक १ हजार ७२७ अशा ५ हजार ५५९८ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षापासून आढावा घेतल्यास प्रत्येक महिन्यातील मृत्यूचा आकडा हा अधिक असल्याचे दिसून आले आहे. यात २०२० च्या एप्रिल महिन्यात ४२५, मे ३८६, जून ३६३, जुलै ४४२, ऑगस्ट ५०६, सप्टेंबर ५५९, ऑक्टोबर ५४०, नोव्हेंबर ५१५ तर डिसेंबर महिन्यात ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. चालू जानेवारी महिन्यात ४७५, फेब्रुवारी ४५२ तर मार्च महिन्यात ४९६ जणांचा विविध आजारांनी मृत्यू झाला आहे. अनैसर्गिक पद्धतीने झालेल्या या मृत्यूच्या नोंदी आरोग्य विभागाकडे करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.