शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी साडेपाच हजार नागरिक दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात साधारण ६०० जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा १.८ टक्के असल्याचे वारंवार ...

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात साधारण ६०० जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा १.८ टक्के असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. परंतु त्यासोबत जिल्ह्यात इतर आजारांनी दगावणाऱ्यांची संख्याही कमी नसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षात साडेपाच हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये काेरोनाचा शिरकाव झाला होता. जुलै २०२० पर्यंत आटोक्यात असलेल्या कोरोनाने वेग पकडत ऑगस्ट महिन्यापासून मृत्यूची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. यातून आजअखेरीस कोरोनामुळे ६३३ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही मृत्यूची ही मालिका सुरुच आहे. कोरोनाचा हाहाकार सुरू असताना विविध आजारांनी मृत होणाऱ्यांची संख्या मात्र मोठी असल्याचे दिसून आले असून वर्षभरात विविध आजारांनी ५ हजार ४९८ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिसारामुळे तीन, क्षयरोगामुळे ६८, श्वसनाच्या विकारांनी २९१, तापजन्य आजाराने ५६, एचआयव्ही २५, कॅन्सर २०६, मेंदूविकाराने १८५, अपघातांमध्ये २४९, आत्महत्या २०१, जनावरांनी चावा घेणे व दंशाने ४२, तीव्ररोगांमुळे ३९९, हृदयविकाराच्या धक्क्याने ८०९ तर जुनाट आजारांनी सर्वाधिक १ हजार ७२७ अशा ५ हजार ५५९८ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षापासून आढावा घेतल्यास प्रत्येक महिन्यातील मृत्यूचा आकडा हा अधिक असल्याचे दिसून आले आहे. यात २०२० च्या एप्रिल महिन्यात ४२५, मे ३८६, जून ३६३, जुलै ४४२, ऑगस्ट ५०६, सप्टेंबर ५५९, ऑक्टोबर ५४०, नोव्हेंबर ५१५ तर डिसेंबर महिन्यात ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. चालू जानेवारी महिन्यात ४७५, फेब्रुवारी ४५२ तर मार्च महिन्यात ४९६ जणांचा विविध आजारांनी मृत्यू झाला आहे. अनैसर्गिक पद्धतीने झालेल्या या मृत्यूच्या नोंदी आरोग्य विभागाकडे करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.