शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात 50 तक्रारींवर झाली ‘चर्चा’ : नंदुरबार लोकशाही दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रशासनातील अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यात संवाद होऊन तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू केलेल्या लोकशाही दिनाकडे सामान्यच पाठ फिरवत आहेत़ परिणामी गेल्या वर्षात केवळ 50 तक्रारी येऊन त्यावर चर्चा करण्यात आली होती़        फेब्रुवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात झाला, याठिकाणी तब्बल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रशासनातील अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यात संवाद होऊन तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू केलेल्या लोकशाही दिनाकडे सामान्यच पाठ फिरवत आहेत़ परिणामी गेल्या वर्षात केवळ 50 तक्रारी येऊन त्यावर चर्चा करण्यात आली होती़        फेब्रुवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात झाला, याठिकाणी तब्बल 12 तक्रारी मांडण्यात आल्या़ जमिन, तंबाखूमुक्त अभियान, स्वच्छता आणि रोजगार या विषयांच्या तक्रारींवर चर्चा होऊन पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत़ गेल्या वर्षात झालेल्या 50 तक्रारींवर केवळ चर्चाच झाल्याने नागरिक लोकशाही दिनी फिरकत नसल्याचे स्पष्ट होऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने चांगल्या उपक्रमाची वाताहत सुरू झाली आह़े याउलट गेल्या वर्षात ऑनलाईन पोर्टलवर सातत्याने तक्रारी वाढल्या़  सोमवारच्या लोकशाही दिनात अपंग असलेल्या पाटील दाम्पत्यच्या तक्रारीवर बोलताना जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी यांनी संबधित विभागाच्या अधिका:यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या़ या सूचना मिळाल्यानंतर ‘गेल्या’ लोकशाही दिनाप्रमाणेच त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कारवाई करणार असल्याचे सांगितल़े हीच स्थिती इतरही तक्रारींबाबत दिसून आली़ यातील एका व्यक्तीने अनधिकृतपणे उघडय़ावर तंबाखू पुडय़ा बांधण्याच्या व्यवसायाला विरोध करत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला होता़ संबधिताने कारवाई न झाल्याने सलग दुस:यांदा लोकशाही दिनात गा:हाणे मांडल़े एकीकडे लोकशाही दिनाला नागरिक येत नसताना दुसरीकडे ऑनलाईन तक्रारींचे प्रमाण मात्र वाढीस लागल्याचे गेल्या वर्षात दिसून आल़े जानेवारी ते डिसेंबर 2017 या कालावधीत शासनाच्या आपले सरकार या ऑनलाईन पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयाला 266 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ यात 248 तक्रारींचा निपटारा करण्यात आला़ तर उर्वरित 16 तक्रारी ह्या कारवाईसाठी पुढे पाठवण्यात आल्या आहेत़ त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नसली तरी येत्या काही दिवसात त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े दुर्गम भागात आपले सरकारबाबत जनजागृती होत असल्याचे सांगण्यात येत आह़े