शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST

शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपाययोजनेचा भाग म्हणून शनिवार व रविवार दोन दिवस पूर्णत: संचारबंदीचे ...

शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपाययोजनेचा भाग म्हणून शनिवार व रविवार दोन दिवस पूर्णत: संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर लागलीच ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्णत: संचारबंदीचे निर्देश दिले आहेत. यात अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. दरम्यान, या काळात नागरिकांनी घाबरून न जाता घरीच राहणे पसंत करावे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी औषधांची दुकाने, रुग्णालये पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. दूध वितरकांना सकाळी सात ते नऊ व संध्याकाळी सहा ते आठ या वेळेस दूध वितरणास परवानगी राहणार आहे. तसेच किराणा आस्थापना सकाळी सहा ते ११ या वेळेत सुरू राहण्यास परवानगी राहणार असल्याने नागरिकांनी अतिरिक्त साठा घरात साठवू नये. बाजारात सामान अथवा वस्तू घेण्यासाठी गर्दी करू नये. आवश्यक तेवढाच सामान खरेदी करावा. कामानिमित्त घराबाहेर निघताना मास्क परिधान करावा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, दूध, भाजीपाला, किराणा आदी तत्सम वस्तूंचा घरपोच सेवेस प्राधान्य द्यावे, शहरातील काही दुकानदारांनी घरपोच सामान पोहोचविण्याची प्रक्रिया अमलात आणलेली आहे. बाजारात प्रत्यक्ष वस्तू खरेदी करण्यासाठी न जाता फोनवर अथवा संबंधित दुकानांशी संपर्क साधून घरपोच सामान मागविण्यास प्राधान्य द्यावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.