शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:06 IST

शहादा उपविभागाची कारवाई : 800 कृषी पंपांचा वीजपुरवठा कापला

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : कृषी पंपाचे वीज बिल न भरल्याने महावितरणच्या शहादा उपविभागाकडून 800 कृषी पंप धारकांचे 36 विद्युत रोहित्रांवरील विज विजजोडणी खंडीत करण्यात आले आह़े अनेक वेळा सूचना देऊनही वीज बिल न भरल्यामुळे महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली आह़ेशहादा उपविभागात शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव असे चार तालुके येतात़ त्यात एकूण 23 हजार 369 कृषी पंपधारक आहेत़ त्यांच्याकडे एकूण 280 कोटी 65 लाख इतकी प्रचंड थकबाकी आह़े शहादा क्ऱ1 मध्ये एकूण ग्राहक 7 हजार 946 तर, थकबाकी 112 कोटी 4 लाख, शहादा क्ऱ2 मध्ये एकूण ग्राहक 7 हजार 532 तर थकबाकी 112 कोटी 66 लाख, अक्कलकुव्यात ग्राहक 1 हजार 747 तर थकबाकी 7 कोटी 26 लाख तसेच धडगाव येथे ग्राहक 576 तर थकबाकी 2 कोटी 6 लाख, तळोद्यात 5 हजार 568 ग्राहक तर थकबाकी 46 कोटी 61 लाख अशी एकूण 280 कोटी 65 लाख रुपयांची थकबाकी आह़े एवढय़ा मोठय़ा रकमेचे वीज बिल थकीत असल्याने याची वसूली करणे आता महावितरणसमोर आव्हान असल्याचे मानले जात आह़े दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरण कंपनीकडून थकबाकीदार शेतक:यांकडून वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आह़े ज्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन खंडीत करण्यात आले आह़े, त्यांचे वीज भरणा भरल्या शिवाय पुन्हा वीज कनेक्शन करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आह़े तसेच संबंधितांनी तालुक्यातील विभागीय कार्यालयात जाऊन लवकरात लवकर  बिले भरावे असा आवाहन महावितरणकडून करण्यात येत आह़ेदरम्यान ज्यांनी अजूनही बिले भरली नसतील त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आह़े जमिनीची विक्री करुनही भरणा शक्य नाहीदरम्यान 280 कोटी रुपयांची थकबाकी म्हणजे साधी बाब नसल्याचे संबंधित शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े जमीन विकल्यावरदेखील थकबाकी भरता येणार नसल्याच्या हताश प्रतिक्रीया शेतक:यांकडून आता उमटताना दिसत आह़े त्यामुळे शासनाने ही थकबाकीची रक्कम माफ करावी अशी मागणी आता संबंधित शेतक:यांकडून करण्यात येत आह़े  परंतु महावितरणकडून याला नकार देण्यात आला आह़े ऐवढी मोठी रकमेची थकबाकी माफ करणे परवडणारे नसल्याचे महावितरणच्या अधिका:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे शेतक:यांना ही थकबाकी भरावीच लागणार असल्याचे चित्र दिसून येत आह़े  दरम्यान, या आधीदेखील संबंधित शेतकरी व महावितरणचे अधिकारी यांच्यात थकबाकीबाबत संघर्ष दिसून आला आह़े थकबाकी माफ करण्यात यावी या मागणीसाठी अनेक वेळा शेतक:यांकडून मोर्चा आंदोलने करण्यात आली आहेत़ परंतु महावितरणचे अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे वेळावेळी दिसून आले आह़े दरम्यान ही थकबाकी टप्प्या-टप्प्याने भरावी असाही पर्याय महावितरणकडून  खुला करुन देण्यात आला आह़े नापिकी  तसेच दुष्काळाशी दोन हात करणा:या शेतक:यांना ऐवढी रक्कम भरणे  शक्य नसल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान, 800  कृषी पंपांची जोडणी खंडीत करण्यात आल्यामुळे आता शेतक:यांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ आधिच पाण्याची चणचण असताना शेतक:यांना आता कृषी पंपाचाही आधार नसल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न आता निर्माण होत आह़े