शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

धुळे व नंदुरबार जिल्हा पर्यटनाचे ‘हब’ करणार : चेतक फेस्टीवलचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 11:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सारंगखेडा फेस्टीवल हा राज्यातील प्रमुख पाच फेस्टीवलमध्ये राज्यशासनाने समाविष्ट केला असून आगामी 100 वर्षे हा फेस्टीवल यशस्वीपणे साजरा होईल असा विश्वास व्यक्त करीत, पर्यटन विभागाने धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र विकासाकडे गांभिर्याने लक्ष घातले असून हा भाग पर्यटन हब बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री तथा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सारंगखेडा फेस्टीवल हा राज्यातील प्रमुख पाच फेस्टीवलमध्ये राज्यशासनाने समाविष्ट केला असून आगामी 100 वर्षे हा फेस्टीवल यशस्वीपणे साजरा होईल असा विश्वास व्यक्त करीत, पर्यटन विभागाने धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र विकासाकडे गांभिर्याने लक्ष घातले असून हा भाग पर्यटन हब बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केल़े सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलचे पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते रविवारी शानदार उद्घाटन झाल़े याप्रसंगी ते बोलत होत़े व्यासपीठावर माजीमंत्री आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ़ कुमुदिनी गावीत, दोंडाईचाच्या नगराध्यक्ष नयनकुंवर रावल, चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपाल रावल, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधिक्षक संजय पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी़एम़मोहन, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सरपंच भारतीबाई कोळी, रशियाच्या छायाचित्रकार कातिया डूज, जपानच्या शिष्टमंडळातील वाकायामा प्रिफेर गव्र्हमेंटचे योशियो यामाशिता, वाकायामा प्रिफेर गव्र्हमेंटच्या आंतरराष्ट्रीय नियोजन विभागाचे ओनिशी तात्सुनोरी आणि इतर जपानी मान्यवर उपस्थित राहणार आहेत़ आदी उपस्थित होत़े यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, पर्यटन विकासाच्या माध्यमातून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा:या प्रकाशा तीर्थक्षेत्र असो, रावलापाणी असो, उनपदेव असो, नंदुरबारचा इमाम बादशाह दर्गा, गजानन महाराज मंदिर, धुळ्यातील लळींग किल्ला, भामेर किल्ला असे विविध ठिकाणच्या विकासाचे कामे हाती घेण्यात आली आहेत़ तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण असून महाबळेश्वरच्या विकासाप्रमाणे तेथेही विकासासाठी प्रयत्न असून त्यासाठी यावर्षी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितल़े या दोन्ही जिल्ह्यातील पर्यटनाच्या कामाला गती यावी नव्हे, तर हा भाग पर्यटन हब म्हणून नावारूपाला यावा, यासाठी पर्यटन विभागाचे प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे मंजूर करण्यात आले असून लवकरच ते कार्यान्वित होईल असे त्यांनी सांगितल़े सारंगखेडा येथील चेतक महोत्सव आगामी 10 वर्षासाठी राज्य शासनाने एका संस्थेशी करार केला आह़े तो यशस्वी झाल्यास आगामी 100 वर्ष हा फेस्टीवल सुरूच राहिल़ राज्यशासनाने कायमस्वरूपी फेस्टीवल साजरा करण्यासाठी अजिंठा फेस्टीवल प्रमाणे या फेस्टीवलचा समावेश केला असून तसा अध्यादेशही काढल्याचे त्यांनी सांगितल़े यावेळी डॉ़ विजयकुमार गावीत यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विकासाच्या कल्पना मांडल्या़ प्रसंगी हजारोंच्या संख्येने पर्यटक व यात्रेकरू उपस्थित होत़े