शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘ओखी’मुळे भाविक प्रकाशात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : ओखीचे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकल्याने नर्मदा परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथे अडकले आहे. जोर्पयत सुरत येथून जिल्हाधिका:यांचा आदेश येत नाही तोर्पयत हे भाविक येथेच राहतील, असे त्यांच्या मुख्यालयातर्फे सांगण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून भाविक येथे थांबून आहेत.नर्मदा व तापी परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथून पुढे जातात. ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : ओखीचे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकल्याने नर्मदा परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथे अडकले आहे. जोर्पयत सुरत येथून जिल्हाधिका:यांचा आदेश येत नाही तोर्पयत हे भाविक येथेच राहतील, असे त्यांच्या मुख्यालयातर्फे सांगण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून भाविक येथे थांबून आहेत.नर्मदा व तापी परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथून पुढे जातात. त्यामुळे त्यांचा प्रकाशा येथे मुक्काम असतो. मध्य प्रदेशातून तापी परिक्रमासाठी निघालेले शेकडो भाविक प्रकाशा येथे गेल्या पाच दिवसांपासून मुक्कामी आहेत. काही भाविक पायी परिक्रमा करणारे आहेत तर काही वाहनाने प्रवास करणारे आहेत. या भाविकांची वाहने          सद्गुरू धर्मशाळा व केदारेश्वर मंदिर परिसरात थांबून आहेत. यात 10 ट्रॅव्हल्स व पाच ते सहा खाजगी वाहने आहेत. गेल्या पाच दिवसापासून थांबून असल्याने ते येथून निघण्याची वाट पाहात आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था असली तरी खाण्या-पिण्यासाठी त्यांचा अतिरिक्त खर्च होत आहे.नर्मदा परिक्रमेसाठी प्रकाशाहून गुजरात राज्यात बिमलेश्वर गावाहून नावेवर बसून चार तास प्रवास करून मिठीनकाई येथे पोहोचावे लागते. हा प्रवास समुद्रातून करावा लागतो. मात्र ओखी वादळामुळे तेथील जिल्हाधिका:यांनी हा मार्ग बंद केल्याचे समजते. जोर्पयत पुढील आदेश मिळत नाही तोर्पयत भाविकांना पुढे जाता येणार नाही. त्यामुळे भाविक याठिकाणी थांबून आहेत. येथील सद्गुरू धर्मशाळेत परिक्रमा करणा:या भाविकांनी संख्या वाढत असल्याने याठिकाणी एक दिवसाच्या मुक्कामासाठी एका भाविकाला 20 रुपये भाडे द्यावे लागते.गेल्या 15 दिवसांपासून गावातून परिक्रमेसाठी निघालो असून पाच दिवसांपासून याठिकाणी थांबून आहोत. सोबत 50 यात्रेकरू असून, जेवणाची व्यवस्था ट्रॅव्हल्सवाले करतात. मात्र राहण्यासाठी व इतर कामासाठी खर्च होतो. शिवाय वेळेवर पोहोचलो नाही तर यात्राही पूर्ण होणार नाही म्हणून पुढील आदेशाची वाट पाहत असल्याची माहिती होशंगाबाद येथील चंद्रभानसिंग पोली या भाविकाने दिली. भाविकांची संख्या वाढत असली तरी आम्ही त्यांची व्यवस्था करीत असल्याचे सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी यांनी सांगितले.