शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

‘ओखी’मुळे भाविक प्रकाशात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : ओखीचे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकल्याने नर्मदा परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथे अडकले आहे. जोर्पयत सुरत येथून जिल्हाधिका:यांचा आदेश येत नाही तोर्पयत हे भाविक येथेच राहतील, असे त्यांच्या मुख्यालयातर्फे सांगण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून भाविक येथे थांबून आहेत.नर्मदा व तापी परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथून पुढे जातात. ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : ओखीचे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकल्याने नर्मदा परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथे अडकले आहे. जोर्पयत सुरत येथून जिल्हाधिका:यांचा आदेश येत नाही तोर्पयत हे भाविक येथेच राहतील, असे त्यांच्या मुख्यालयातर्फे सांगण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून भाविक येथे थांबून आहेत.नर्मदा व तापी परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथून पुढे जातात. त्यामुळे त्यांचा प्रकाशा येथे मुक्काम असतो. मध्य प्रदेशातून तापी परिक्रमासाठी निघालेले शेकडो भाविक प्रकाशा येथे गेल्या पाच दिवसांपासून मुक्कामी आहेत. काही भाविक पायी परिक्रमा करणारे आहेत तर काही वाहनाने प्रवास करणारे आहेत. या भाविकांची वाहने          सद्गुरू धर्मशाळा व केदारेश्वर मंदिर परिसरात थांबून आहेत. यात 10 ट्रॅव्हल्स व पाच ते सहा खाजगी वाहने आहेत. गेल्या पाच दिवसापासून थांबून असल्याने ते येथून निघण्याची वाट पाहात आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था असली तरी खाण्या-पिण्यासाठी त्यांचा अतिरिक्त खर्च होत आहे.नर्मदा परिक्रमेसाठी प्रकाशाहून गुजरात राज्यात बिमलेश्वर गावाहून नावेवर बसून चार तास प्रवास करून मिठीनकाई येथे पोहोचावे लागते. हा प्रवास समुद्रातून करावा लागतो. मात्र ओखी वादळामुळे तेथील जिल्हाधिका:यांनी हा मार्ग बंद केल्याचे समजते. जोर्पयत पुढील आदेश मिळत नाही तोर्पयत भाविकांना पुढे जाता येणार नाही. त्यामुळे भाविक याठिकाणी थांबून आहेत. येथील सद्गुरू धर्मशाळेत परिक्रमा करणा:या भाविकांनी संख्या वाढत असल्याने याठिकाणी एक दिवसाच्या मुक्कामासाठी एका भाविकाला 20 रुपये भाडे द्यावे लागते.गेल्या 15 दिवसांपासून गावातून परिक्रमेसाठी निघालो असून पाच दिवसांपासून याठिकाणी थांबून आहोत. सोबत 50 यात्रेकरू असून, जेवणाची व्यवस्था ट्रॅव्हल्सवाले करतात. मात्र राहण्यासाठी व इतर कामासाठी खर्च होतो. शिवाय वेळेवर पोहोचलो नाही तर यात्राही पूर्ण होणार नाही म्हणून पुढील आदेशाची वाट पाहत असल्याची माहिती होशंगाबाद येथील चंद्रभानसिंग पोली या भाविकाने दिली. भाविकांची संख्या वाढत असली तरी आम्ही त्यांची व्यवस्था करीत असल्याचे सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी यांनी सांगितले.