शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

ग्राम सामाजिक परिवर्तनातून गावांचा विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून नीती आयोगाच्या तत्त्वानुसार विकासाचे काम होत आहे. त्याचे चांगले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून नीती आयोगाच्या तत्त्वानुसार विकासाचे काम होत आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. ग्रामस्थांनी अभियानाला सहकार्य करावे. त्यातून त्यांची आणि गावाची प्रगती होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज भादवड, ता.नवापूर येथे केले. अमिताभ कांत यांनी नवापूर तालुक्यातील भादवड येथे भेट दिली. महाराष्ट ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून गावात होणा:या कामांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, गटविकास अधिकारी वर्षा फडोळ, गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, पिरॅमल फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक किशोर घरत, अभियानाच्या जिल्हा कार्यकारी योगिनी खानोलकर आदी उपस्थित होते. कांत यांनी शाळा वर्ग खोल्यांची पाहणी केली. वर्गावर जाऊन विद्याथ्र्यांशी संवाद साधला, अभ्यासक्रमाची माहिती घेतली.  डिजिटल साहित्याच्या वापरात दीक्षा अॅपचा वापर कसा केला जातो ते प्रत्यक्ष पाहिले. शालेय पोषण आहार, स्वच्छतागृह, नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा, नवीन वर्गखोल्या  पहिल्या आणि शिक्षकांशी शिकवण्याच्या पद्धती याबाबद्दल चर्चा केली. डॉ.राहुल चौधरी यांनी 100} पाठ्यपुस्तक, संक्रमण दर आणि आवश्यक वर्गखोल्या, स्वच्छतागृहे यांची माहिती दिली. यासोबतच जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी सोलर पॅनलची मागणीही केली. जुबेर तांबोळी यांनी शाळेची पटसंख्या 297 असून सर्वाना सोयी सुविधांयुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते सोबतच वर्गखोल्याची आवश्यकता सांगितली. नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेविषयी धिरज खैरनार यांनी माहिती दिली.  या शाळांच्या डिजिटलायजेशन मुळे शिकवणे सोपे झाले आहे असे मनोगत तेथील शिक्षकांनी व्यक्त केले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या गावातील संस्थाना सोलरची जोडणी करण्यात आली असल्याचे अभियानाच्या जिल्हा कार्यकारी योगिनी खानोलकर यांनी माहिती दिली. जिल्हा परिषद केंद्रशाळा भादवड येथील विजय गावित, जगदीश गावित, राजश्री कुलकर्णी, धनवंत बैसाने, सुनंदा अहिरे, हरकलाल गांगुर्डे, सुनील वानखेडे, प्रमिला कोकणी, रंजना गावित, धिरज खैरनार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रय} केले.सेंट्रल किचनला भेट अमिताभ कांत यांनी सेंट्रल किचनला भेट देऊन तेथील अन्न पदार्थांची चव घेतली. त्यांनी संपुर्ण यंत्रणेची माहिती घेतली व येथील कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. येथे तयार होणारे अन्न पौष्टीक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी एकलव्य इंग्रजी माध्यम शाळेला भेट देऊन विद्याथ्र्यांशी संवाद साधला. आपले शिक्षण यापेक्षाही सामान्य शाळेत झाले आहे. त्यामुळे एवढ्या सुंदर शाळेत शिकणारे विद्यार्थी भाग्यवान आहेत. शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर आहे. येथील सुविधांचा लाभ घेऊन चांगले यश संपादन करा. जीवनात एकतरी छंद जोपासा आणि एक तरी खेळात नैपुण्य मिळवा, असे आवाहन त्यांनी विद्याथ्र्यांना केले. हॉकी स्पर्धेत यश मिळविणा:या खेळाडुंचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.

नंदुरबार जिल्ह्याला केंद्र शासनाच्या नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. त्यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभा शिंदे व गणेश पराडके यांनी जिल्ह्यातील विकासासंदर्भातील समस्या मांडण्यासाठी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत जिल्ह्यातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यासाठी सीएफआरच्या माध्यमातून ज्या गावांना सामूहिक वनहक्क मिळाले आहेत त्यांच्या माध्यमातून स्थानिक रोजगारासाठी नियोजन करण्यात यावे, तोरणमाळ ग्रामपंचायतीमधील गावांच्या सामूहिक वन व्यवस्थापन समितींच्या माध्यमातून पर्यटनस्थळ विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा, नर्मदेतून मिळालेले 10 टीएमसी व तापीतून मिळालेले पाच टीएमसी पाणी उचलून अक्कलकुवा, धडगाव, शहादा व तळोदा तालुक्यातील सिंचन व पाण्याचा प्रश्न सोडवला जावा आदी या विषयांवर चर्चा करण्यात आली.