शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्ते असूनही अपघात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय असूनही अपघात कमी करण्यात प्रशासनाला यश आले असल्याचा दावा उपप्रादेशिक परिवहन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय असूनही अपघात कमी करण्यात प्रशासनाला यश आले असल्याचा दावा उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ शनिवारी पालिका सभागृहात झाला.जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.डी. बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुधाकर चौरे, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान आदी उपस्थित होते. सुरुवातीस रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतुकीचे नियम व रस्त्यावरील सांकेतिक खुणा दर्शविणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. महेंद्र पंडित यांनी सांगितले, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग यांनी संयुक्तरीत्या काम करावयाचे आहे. दरवर्षी जिल्ह्यात अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दहा टक्के पर्यंत कमी करणे असा उद्देश आपण ठेवला आहे. या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये जनजागृती करणे वाहतुकीच्या नियमांचे पालन हा आहे. हेल्मेट आपल्या स्वत:च्या सुरक्षेसाठी असतानाही त्याला विरोध होता कामा नये. जिल्ह्यात दरवर्षी दीडशे ते दोनशे लोक अपघातात मृत्युमुखी पडतात तर पाचशे लोक गंभीर जखमी होतात. मृत्युमुखी पडणाºयांची वयोमयार्दा २० ते ५० च्या दरम्यान आहे. सर्वाधिक अपघात दुपारी ३ ते रात्री नऊच्या दरम्यान होतात. रस्त्यावरील नियम पाळण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. उद्दिष्ठपूर्तीसाठी वाहनांवर कारवाई केली जात नाही शहरात वाहतुकीचा बेशिस्त वाहतूकपणा दिसून येतो. शिस्त लावण्यासाठी ही कारवाई होत असते. असेही त्यांनी सांगितले.प्रास्ताविकात बच्छाव यांनी सांगितले, जिल्ह्यात २०१८ मध्ये ४९९ अपघात झाले होते ते यावर्षी ४१० पर्यंत म्हणजेच १८ टक्क्यांनी कमी झाले आहेत. मागील वर्षी अपघातात मृत्युमुखीची संख्या १७७ होती ती यावर्षी १५२ झाली आहे. त्यातही १४ टक्के घट आली आहे. जखमींची संख्या ३२ टक्क्यांनी कमी झाली आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तर्फे विविध विभाग एकत्ररित्या काम करत असल्याने त्याचा परिणाम अपघात कमी होण्यात दिसून येतो.जिल्ह्यात रस्त्यांची अवस्था ही खड्डेमय असूनही आपण अपघात कमी करू शकलो आहोत. यावेळी चंद्रकांत गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित राजपूत यांनी तर आभार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांनी मानले.