शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
3
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
4
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
5
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
6
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
7
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
8
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
9
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
10
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
11
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
12
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
13
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
14
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
15
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
16
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
17
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
18
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
19
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

इमारत असूनही पाण्याची सुविधा नाही : नंदुरबार शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात गेल्या चार वर्षापासून मुलींचे वसतिगृह बांधण्यात आले आह़े परंतु येथे पाण्याची सुविधा नसल्याने हे वसतिगृह धुळखात आह़े परिणामी विद्यार्थिनींना वसतिगृह असतानाही इतरत्र जादा घरभाडे देऊन रहावे लागत आह़ेयेथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्याथ्र्यासाठी असलेल्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आह़े शासकीय तंत्रनिकेतन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात गेल्या चार वर्षापासून मुलींचे वसतिगृह बांधण्यात आले आह़े परंतु येथे पाण्याची सुविधा नसल्याने हे वसतिगृह धुळखात आह़े परिणामी विद्यार्थिनींना वसतिगृह असतानाही इतरत्र जादा घरभाडे देऊन रहावे लागत आह़ेयेथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्याथ्र्यासाठी असलेल्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आह़े शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय असताना येथील इमारती तसेच कॉलेज कॅम्पसची स्थिती भुताटकी इमारती सारखी झाली आह़े या ठिकाणी 2009 मध्ये महाविद्यालयाचे बांधकाम करण्यात आले होत़े त्यानंतर सुमारे पाच वर्षानी येथे मुलींसाठी वसतिगृहदेखील बांधण्यात आले आह़े 62 खोल्यांचे असलेले हे वसतिगृह गेल्या अनेक वर्षापासून तसेच पडून आह़े या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने वसतिगृहाचा वापर निरुपयोगी वस्तू ठेवण्यासाठीच करण्यात येत असल्याचे दिसून येत आह़े या वसतिगृहाच्या भोवताली डोक्याबरोबर झुडपे वाढले आह़े तसेच वापरात नसल्याने धुळीचेही साम्राज्य निर्माण झालेले आह़े कॉलेज कॅम्पसमध्ये सुमारे चार कुपनलिका करण्यात आल्या आह़े परंतु वसतिगृहाच्या परिसरात कुपनलिकांना पाणी लागत नसल्याने या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होत आह़े तंत्रशिक्षण महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विविध जिल्ह्यातून विद्यार्थिनी येत असतात़ त्यामुळे शासनाकडूनही याची दखल घेत त्यांच्यासाठी वसतिगृह बांधण्यात आले होत़े परंतु त्याआधी पाणी, वीज, विद्यार्थिनींची सुरक्षितता या मुलभूत गोष्टींचे नियोजन होणे आवश्यक  होत़ेपरंतु तसे झाले नाही़ परिणामी लाखो रुपयांचे वसतिगृह बांधूनदेखील विद्यार्थिनींना परिसरात भाडय़ाने रुम घेऊन जादा घरभाडे मोजावे लागत असल्याच्या व्यथा विद्यार्थिनींकडून मांडण्यात येत           आह़े परिसरात अनेक नागरिकांकडून विद्याथ्र्यांची राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने घरे बांधण्यात आली आह़े विद्याथ्र्याना भाडय़ाने रुम देण्याचा व्यवसायदेखील अनेक रहिवाशांकडून सुरु करण्यात आला आह़े परंतु विद्यार्थी संख्या जास्त झाल्यास अनेक घर मालकांकडून ही संधी हेरत घरभाडे वाढविण्यात येत असत़े त्यामुळे अनेक विद्याथ्र्याची आर्थिक पिळवणूकदेखील होत असल्याचा आरोप करण्यात आला आह़े यात विद्यार्थिनींची व्यथा अधिकच बिकट आह़े विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाकडून वसतिगृह बांधण्यात आले असूनही ते वापरात नसल्याने आपल्या हक्काच्या सोयी-सुविधांपासून त्यांना वंचित रहावे लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने याबाबत पाठपुरावा करुन पाण्याची व्यवस्था करुन त्वरीत वसतिगृह वापरास खुले करण्याची अपेक्षा         आह़े