शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पुरबाधा टाळण्यासाठी नाला खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : मागील तीन वर्षांपासून चिंचपाडा ता. नवापूर येथील १७ घरांमध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी शिरुन घरांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : मागील तीन वर्षांपासून चिंचपाडा ता. नवापूर येथील १७ घरांमध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी शिरुन घरांचे नुकसान होत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तेथे नाला खोलीकरणच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.चिंचपाडा हे गाव झोडंबी तथा मसावट नाल्यावर वसले असून या नाल्याला काही उपनाले देखील आहे. या सर्व नाल्यांचे पाणी एकत्र झाल्यास मोठ्या नाल्यातील पाणी थेट नागरी वसाहतीत शिरते. त्यात घरांचे नुकसान होऊन संसार उघड्यावर येतात. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत चिंचपाडा येथील नागरिकांमध्ये पुराची भिती निर्माण होते. अशी परिस्थिती मागील दोन वर्षांपासून पावसाळ्यात उद्भवत आहे. मागील पावसाळ्यात १७ घरांमध्ये नाल्याचा पुर शिरल्याची नोंद महसुल विभाग व ग्रामपंचायतीकडे करण्यात आली, त्यात नुकसानग्रस्त कुटुंबियांचा संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. तर २०१८ व २०१७ मधील पावसाळ्यात प्रत्येकी नऊ घरांमध्ये पुराचे पाणी शिरत त्यांचेही मोठे नुकसान झाले.तीन वर्षांपासून होणाऱ्या या नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांसह तेथील नारिकांनी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यात नागरिकांनी गावातील मुख्य नाल्याचे खोलीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत संबंधित विभागामार्फत गावातील नाल्याचे खोलीकरणसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाकडून मंजूरी देखील देण्यात आली. शिवाय १८ लाखाची निधी जिल्हा वार्षिक नियोजनमधून उपलब्ध करुन देण्यात आला. निधीही उपलब्ध करुन दिल्यामुळे आमागी पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत नाला खोलीकरणचे काम हाती घेण्यात आले आहे.शासनामार्फत नाल्या खोलीकरणचे काम सुरु केल्यामुळे पुढील पावसाळा फारसा संकटाचा राहणार नसल्याचे तेथील नागरिकांमार्फत सांगण्यात येत आहे. शिवाय नाला खोल राहिल्यास काही प्रमाणात पुरपरिस्थितीवर मात देखील करता येईल, असे मतही तेथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.गावात उद्भवणारी पुरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शसनामार्फत नाला खोलीकरणचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम एक कि.मी. व ८०० मिटरवर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण चिंचपाडा गाव आगामी पावसाळ्यात सुरक्षीत राहतील अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.मुख्य मसावट नाल्याला अनेक उपनाले असल्यामुळे मुख्य नाल्याची खोली व रुंदी आवश्यकतेनुसार ठेवण्यात येणार असल्याचे संबंधित यंत्रणेमार्फत सांगण्यात येत आहे. तर नाला साफसफाईची अन्य सर्व कामेही तातडीने घेण्याची मागणी करण्यात आली आहे.