शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वंचित समाज घटकांनाही सत्तेत भागीदारी मिळावी : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 12:53 IST

महाराष्ट्रभर दौरा सुरू, लोकमत संवाद उपक्रमात विविध विषयांवर चर्चा

<p>नंदुरबार : महाराष्ट्रातील वंचित समाज घटकांना एकत्र करून आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आपला प्रय} आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आपण दौरा करीत आहोत. या वंचित समाज घटकांनाही सत्तेत सहभागी करून त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे हा आपला प्रामाणिक प्रय} असून आगामी निवडणुकीत पैशाला महत्त्व न राहता विचारांनाच महत्व येईल, असा दावा भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ संवाद कार्यक्रमात बोलतांना केला.वंचित बहुजन आघाडी संवाद यात्रेच्या निमित्ताने सध्या अॅड.प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत. शुक्रवारी ते नंदुरबारात आले असता ‘लोकमत’ कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळपणे संवाद साधला. ‘लोकमत’चे कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. मनोज शेलार, भूषण रामराजे उपस्थित होते. त्यांच्यासोबत माजी आमदार विजय मोरे, भारिपचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे कॉ.किशोर ढमाले उपस्थित होते.अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी संवाद यात्रेचा मूळ उद्देश स्पष्ट केला. राज्यात आतार्पयत 12 पेक्षा अधिक जिल्ह्यात यानिमित्ताने गेलो आहे. पंढरपुरात धनगर मेळाव्यापासून त्याला सुरुवात झाली. सर्वाना बरोबर घेण्याचा प्रय} आहे. जातीअंतर्गत आणि सामाजिक दृष्टीकोनातून वंचित असलेल्यांची मोट बांधली जात आहे. त्यात यश आले असून ही ताकद आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत नक्कीच दिसून येईल.  ख:या कार्यकत्र्याला संधी दिली जाईल, घराणेशाहीला हद्दपार करण्यात येईल. पैशाला महत्त्व राहणार नसून विचारांची लढाई आता लढली जाणार आहे. आतार्पयतच्या राज्यभरातील दौ:यात व्यापक पाठींबा मिळत आहे. 28 सप्टेंबला सोलापूरला व 2 ऑक्टोबरला औरंगाबादला मेळावा होणार आहे. शिक्षणाचे बदलते धोरण, राखीव जागा, कृषी धोरण, बेरोजगारी हे विषय घेवून या मेळाव्यांमधून जनजागृती केली जात आहे. राष्ट्रवादी पक्ष पूर्वी सेक्यूलर समजला जात होता, परंतु खासदार शरद पवार यांची बदलणारी भूमिका आणि आरएसएसकडे झुकण्याचे प्रमाण पहाता त्यांना सोबत घेण्याबाबत काही अटी असतील. काँग्रेस धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखला जातो, असेही त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच जागांवर आम्ही लढणार आहोत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आदी राज्यात देखील आगामी काळात जाणार आहोत. इतर राज्यांमध्येही चांगला पाठींबा आहे.शेतक:यांच्या प्रश्नांबाबत बोलताना अॅड.आंबेडकर यांनी सांगितले, आरएसएस अर्थात भाजपची संस्कृती मदत देणे या संकल्पनेतील नाही. त्यामुळे कजर्माफीचा प्रश्नच येत नाही. कजर्माफीची घोषणा, त्यानंतरचे फिरविण्यात आलेले निर्णय, 50 पेक्षा अधिक अध्यादेश हे कशाचे द्योतक आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.राज्य सरकार सर्वच आघाडींवर अपयशी ठरले आहे. शेतकरी आंदोलन यांना व्यवस्थित हाताळता आले नाही, शेतीचा खेळखंडोबा केला गेला. जलयुक्त अभियानातील कामांचे आता वाभाडे निघू लागले आहेत. शिक्षणाचे बदलते धोरण विद्याथ्र्याचे भवितव्य धोक्यात आणणारे आहे. गोवंशबंदीसह औद्योगिक धोरणातील धरसोडपणा यामुळे हे सरकार गोंधळी सरकार आहे, असेच म्हणावे लागेल. केंद्रातील मोदी सरकारदेखील यापेक्षा वेगळे नाही. केवळ घोषणा करणे, वल्गना करणे यापलिकडे त्यांना काही जमले नाही. देशातील वातावरण कधी नव्हे एवढे दहशतीचे झाले आहे. कुणाचीही हुकूमशाही जादा काळ चालत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. 2019 च्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून भाजपशी पर्यायाने मोदींशी दोन हात करण्यासाठी तयारीत राहावे असे आपण यापूर्वीदेखील बोललो होतो आताची परिस्थितीही तेच सांगत आहे. राज्यातील भाजप सरकारला मराठय़ांना ख:या अर्थाने आरक्षण लागू करायचे नाही. म्हणूनच चर्चेसाठी सर्व पक्षांना एकत्र बोलविण्याचे मुख्यमंत्री नाटक करीत आहेत. जर सत्ता त्यांच्या हाती आहे तर प्रश्न सोडविण्यास ते समर्थ असले पाहिजे पण, ती परिपक्वता मुख्यमंत्र्यांकडे नसल्याचा आरोपही अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केला.