शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना गंडविले

By admin | Updated: April 17, 2017 23:19 IST

मध्य प्रदेशातील कंपनीचा प्रताप : शहादा व धडगाव तालुक्यातील ठेवीदारांची तक्रार

शहादा : ठेवीवरील रक्कमेवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातील एका कंपनीने शहादा व धडगाव तालुक्यातील गोरगरीब जनतेस सुमारे तीन कोटी रुपयांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीचे एजंट म्हणून काम करणा:या धडगाव तालुक्यातील 10 एजंटांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांकडे धाव घेतली आहे.मध्य प्रदेशातील जी लाईफ ग्रुप ऑफ कंपनीने शहादा व धडगाव तालुक्यात एजंट नेमून ठेवी गोळा केल्या आहेत. ठेवीवर अधिक व्याजाचे प्रलोभन दाखवून व खोटी आश्वासने देऊन सुमारे पाच ते सहा वर्षापासून ठेवी गोळा करण्याचे काम सुरू होते. दरमहा 300 रुपयांपासून ते दोन हजार, पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून 60 महिन्यात दीडपट पैसे देण्याचे आमिष कंपनीकडून दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी या योजनेत पैसे गुंतवले होते. ज्यांची मुदत पूर्ण झाली त्यांना कंपनीने धनादेशही दिले होते. मात्र कंपनीने दिलेले सहा ते सात लाखांचे परतफेडीचे धनादेशही परत आल्याने गुंतवणूकदारांना आपण फसविले गेल्याचे लक्षात आले. कंपनीच्या शिरपूर येथील कार्यालयात ठेवीदार आणि एजंट यांनी पैसे परत मिळण्याची मागणी केली असता तेथेही त्यांच्या पदरी निराशा पडली.धडगाव तालुक्यातील ठेवीदारांनी एजंटांकडे पैशांचा तगादा लावल्याने आणि कंपनीकडून पैसे मिळण्याची अपेक्षा मावळल्याने सरदार नवेल (धडगाव), दिगंबर पवार (अंबापूर, ता.शहादा), सुरेश पावरा (इस्लामपूर, ता.शहादा), गोविंद चितोड (इस्लामपूर, ता.शहादा), गोपाळ शिंदे (धडगाव), संजय शिंदे (वेरी, ता.अक्कलकुवा), उदयसिंग पवार, (अंबापूर, ता.शहादा), राजेंद्र पावरा (धडगाव), अशोक निकुंब (गणोर, ता.शहादा) व गणेश परमार (धडगाव) या 10 एजंटांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांकडे धाव घेऊन जी लाईफ ग्रुप ऑफ कंपनीज, संस्थापक चेअरमन गिरीराज पांडे, व्यवस्थापकीय संचालक दीपक शर्मा, यक्षप्रसाद शर्मा, अनामत अली, रवीराज व व्यवस्थापक जी लाईफ कंपनी शिरपूर कार्यालय यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. जी लाईफ कंपनीच्या संचालकांनी अधिक व्याजाचे प्रलोभन दाखवून व खोटे आश्वासन देऊन गोरगरीब लोकांची फसवणूक  केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. कंपनीच्या संस्थापकांतर्फे नंदुरबार येथे दीपक शर्मा व गिरीराज पांडे यांनी सेमीनार घेऊन विविध प्रलोभने दाखवून ठेवी गोळा केल्या. कंपनीने ठेवीधारकांना प्रमाणपत्रही दिले आहेत. परंतु मुदत पूर्ण होऊनही कंपनीकडून पैसे परत न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाली आहे. ठेवीदार पैशांसाठी एजंटांकडे तगादा लावत असल्याने एजंटांचे जगणे मुश्कील झाले आहे. गोरगरीब आदिवासी जनतेची फसवणूक करणा:या जी लाईफ कंपनी व त्यांच्या संचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.    (तालुका प्रतिनिधी)