शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी- भाजपचे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

निवेदनात म्हटले आहे की, ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. याला केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. खरंतर ...

निवेदनात म्हटले आहे की, ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. याला केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. खरंतर या संदर्भात ३१ जुलै रोजी तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक अध्यादेश काढून डाटा सबमिट करण्याची वेळ न्यायालयाकडे मागली होती. त्यानुसार २८ ऑगस्ट २०१९ रोजी न्यायालयाने दोन महिन्यांची मुदत दिली होती. १३ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की, निर्णयाप्रमाणे ५० टक्केच्या वरचे आरक्षण जस्टीफाय करा आणि पुढच्या तारखेला त्या संदर्भात अहवाल सादर करा. मात्र यावरही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष दिले नाही. राज्यात सर्वाधिक संख्येने उपस्थित असलेला ५८ टक्के ओबीसी समाज. या समाजाला ३५ टक्के आरक्षणाची आवश्यकता असताना यापूर्वीच काँग्रेसने अन्याय केला. १९३१ रोजी शेवटची जनगणना झाली तेव्हा ओबीसी प्रवर्गात २७२ जाती होत्या. त्यावेळेस ५२ टक्के ही संख्या गृहित धरण्यात आली. कालपरत्वे अनेक जातींचा ओबीसी मध्ये समावेश झाला. बघता बघता ओबीसी प्रवर्गात ३५८ जातींचा समावेश झाला. तब्बल ८६ ऐवढ्या जातीचा आधी समावेश झाला असुनही मात्र आरक्षणात वाढ झाली नाही. १९३१ मध्ये ५२ टक्के असलेला ओबीसी समाज आजच्या स्थितीत ५८ ते ६० टक्क्यापर्यंत पोहचला. त्या अनुषंगाने ओबीसी समाजाला आरक्षणात देखील वाढ होणे आवश्यक असतांना ते करण्याऐवजी आहे ते आरक्षण काढून घेतले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हाउपाध्यक्ष मुकेश पाटील, जिल्हा चिटणीस हेमलाल मगरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सयाजी पाटील, ओबीसी महिला मोर्चाच्या अनामिका चौधरी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार, पदाधिकारी नरेंद्र माळी, हर्षल पाटील, योगेश चौधरी, विनोद कामे, डॉ.व्यंकटेश विभांडीक, वैभव सोनार, दीपक चौधरी, शिरीष माळी, खुशाल चौधरी, योगेश माळी, विनोद कामे, संदिप चौधरी, जि.प.सदस्य कपिल चौधरी, देवेश जोहरी यांच्या स्वाक्ष-या आहेत.