शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वीज कनेक्शन खंडित करण्याची मोहिम थांबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने अधिवेशन संपविल्यानंतर थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यासाठी स्थगिती उठावली असल्यामुळे वीज वितरण ...

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने अधिवेशन संपविल्यानंतर थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यासाठी स्थगिती उठावली असल्यामुळे वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांकडून वीजबिल वसूल करण्याची मोहीम ३१ मार्चपर्यंत सुरू केली आहे. ३१ मार्चनंतर थकीत वीजबिलापोटी शेतकऱ्यांचे कनेक्शन खंडित करण्याची मोहीम राबवली जाणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे कनेक्शन खंडित करण्याचे काम सुरू आहे. हे अन्यायकारक असून, शेतकऱ्यांनी वापर केलेली वीज व दिलेले बिल यात जमीन आसमानाचा फरक आहे. शेतकऱ्यांच्या शेतात ना मीटर ना रिडिंग घेता अंदाजे भरमसाट बिले देऊन देशोधडीला लावण्याचे काम वीज महामंडळ करीत आहे.

कॉग्रेसच्या राज्यात शेतकरी संघटनेने शेती पंपाची वीजबिल प्रतिअश्वशक्ती वर्षाला ३०० वरून २८२० वर गेल्यामुळे शासनाच्या विरोधात आंदोलन केले होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आंदोलनावर तोडगा काढून शेतीसाठी २४ तास विजेकरीता ६७ टक्के वीजबिल भरेल व शेतकरी ३३ टक्के भरेल असा आदेश काढला होता. तरीही वीज कनेक्शन कंपनीने शेतकऱ्यांना १६ तास वीज न देत शासनाकडून २४ तासाचे पैसे घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनीकडून येणे असल्याचे पैसे घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनीकडून येणे असल्याने उच्च न्यायालयात दावा केल्याने महावितरण कंपनीने पुढील आदेश येईपर्यंत शेती पंपाचे वीज कनेक्शन खंडित करू नयेत असे स्पष्ट लेखी आदेश असून, सुद्धा शेतकऱ्यांना वीजतोडणीची धमकी देऊन चुकीचे वीज बिले वसूल केले जात असून, मार्चनंतर कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा होत नाही, शेतीमालाला हमी भाव नाही, बियाणे व औषधे, खताचे वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल. तरी आमची विनंती आहे की, चुकीचे वीज बिल वसुली व वीज कनेक्शन तोडणी बंद करण्यात यावी, अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर सत्यशोध ग्रामीण कष्टकरी सभेचे किशोर ढमाले, आर.टी. गावित, होमाबाई गावित, जगन गावित, जेका गावित, गोबजी गावित, गेवाबाई गावित, विक्रम गावितसह असंख्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.