कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेये, रसवंतीगृहे दिलासादायक वाटत असल्यामुळे या शीतपेयांना व उसाच्या रसाला ग्राहकांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी शीतपेय घ्यावे लागत आहे.
लग्नसराई सुरू असल्यामुळे लग्नात मठ्ठा, ताक मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते. उन्हाळ्यात तर बच्चे कंपनीला बर्फाच्या गोळ्याचे भलतेच आकर्षण असते. विविध रंग, चवीत उपलब्ध असलेला गोळा ज्येष्ठांमध्येही लोकप्रिय आहे. साधा गोळा, मावा गोळा, आईस प्लेट यासारखे प्रकार यात उपलब्ध असतात.
सकाळी ११ वाजेपासूनच उन्हाच्या झळा लागू लागत असल्याने दुपारनंतर तर उष्णता असह्य होते. शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी थंडपेयांचा आधार घ्यावा लागतो. काही क्षणांसाठी का होईना शीतपेये आराम देतात. - निंबा दीपचंद कोळी-ग्राहक.
विशेषत: संध्याकाळी रस पिण्यासाठी अधिक गर्दी असते. दुपारी अधिक ऊन असल्याने बहुतेक लोक घराबाहेर, कार्यालयाबाहेर पडायचे टाळतात. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले असतात. तसेच बस थांब्यावरही शुकशुकाट दिसून येतो. - मधुकर पाटील, विक्रेता, वडाळी
मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत जाईल, तसतसे ग्राहक वाढत जाईल, असे वाटते. या कोरोना परिस्थितीमुळे ग्राहकांची संख्या असमाधानकारक दिसून येत आहे. मात्र आम्ही जास्त विक्री कमी नफा तत्वावर ग्राहकांना उसाचा रस देत आहोत. यामुळे सर्वसामान्य नागरिक दुकानावर आकर्षित होत आहेत.