अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर सिंचन प्रकल्पाचे काम २००० मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात २०१८ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाचे ७५ टक्के काम झाले असून, अधिकारी व ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे या प्रकल्पाचेही काम रखडले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे रखडलेले काम लकरात लवकर पूर्ण करून आदिवासी जनतेचे जीवनमान सुधारण्यास मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच या परिसरातील आदिवासींचा स्थलांतराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, वीरबहादुरसिंह राणा, ललित जाट, कान्हा नाईक, सुरेश वसावे आदी उपस्थित होते.
देहली व रामपूर प्रकल्पाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST