शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा परिसरात पिकांची नुकसानभरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

प्रकाशा व परिसरातील डामरखेडा, शेल्टी, करजई, बुपकरी, लांबोळा, नांदरखेडा, बोराळा, सुजालपूर, वर्डे-टेंबे, कलमाडी आदी गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजेपासून ...

प्रकाशा व परिसरातील डामरखेडा, शेल्टी, करजई, बुपकरी, लांबोळा, नांदरखेडा, बोराळा, सुजालपूर, वर्डे-टेंबे, कलमाडी आदी गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजेपासून तर शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत वादळासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाण्याची डबकी साचली आहेत. याचा फटका रब्बी हंगामातील ज्वारी (दादर), हरभरा, गहू या पिकांना बसला असून, पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतांमध्ये पाण्याचे मोठमोठे डबके साचले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या दीड दिवसात प्रकाशा परिसरात २८ ते ३० मिमी पावसाची नोंद वि. का. सोसायटीच्या पर्जन्यमापकात झाली आहे. ज्वारी, हरभरा, गहू या पिकांची फुलधारणा झाली होती. मात्र अवकाळी पावसामुळे पिकावरील फूल गळून पडल्याने आता दाणे भरले जाणार नाही, परिणामी उत्पन्नही येणार नाही. सोबत मका व तूर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातही अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होऊन अपेक्षित उत्पन्न हाती आले नाही. आता रब्बी हंगामातही अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने त्वरित पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी रामचंद्र दशरथ पाटील, हरी दत्तू पाटील, दिलीप ज्ञानदेव पाटील, गुड्डू सोमभाई पाटील, सुरेश गोरख पाटील, अरुण ओंकार पाटील, अरुण जावरे, महेंद्र भोई यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.