दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहूल लागते. मात्र, यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे तापमान जाणवले नाही. मात्र, आता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वातावरणातील पारा वाढला असून तीव्र ऊन पडत आहे. त्यामुळे कुलरची मागणी वाढली आहे. लॉकडाऊनच्या अगोदर कुलर विक्री जोरात सुरू असल्याचे दिसत होते. हवामान खात्यानेही यावर्षी उन्हाळ्यात जास्त पारा वाढणार, असे भाकीत वर्तविले आहे. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी जयनगरसह वडाळी या दोन गावांमध्ये कुलरविक्री दिसून येत होती. मात्र, आता १ एप्रिलपासून १५ दिवसांचा लॉकडाऊन केल्यामुळे या दोन्ही गावांमध्ये स्थानिक प्रशासनामार्फत कडक लॉकडाऊन पाळला जात असल्यामुळे कुलर विक्रीवर याचा परिणाम दिसून येत आहे. गतवर्षी २२ मार्चला लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक दुकानदारांनी लाखो रुपयांचे कुलर व पंख्यांचा माल भरून ठेवला आहे. लोकांची इच्छा असूनही आणि विक्रेत्यांकडे माल असूनही व पारा चढत असूनही लोकांना कुलर घेण्यापासून सध्यातरी वंचितच रहावे लागत आहे.
पारा चढल्यामुळे कुलरला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST