शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

पाटबारा येथील उदय नदीवरील पूल बांधण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील व अक्कलकुवा तालुक्यातील ओरपा ते धडगाव तालुक्यातील पाटबारादरम्यान उदय नदीवर पुलाचे बांधकाम १२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात ...

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील व अक्कलकुवा तालुक्यातील ओरपा ते धडगाव तालुक्यातील पाटबारादरम्यान उदय नदीवर पुलाचे बांधकाम १२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. परंतु कालांतराने हे बांधकाम बंद पडले आहे. १० वर्षांपासून बंद असलेल्या या बांधकामाची पूर्तता करण्याची कारवाई झालेली नाही. परिणामी दुर्गम भागातील पाडली, रणसुमा, पाटामुंड, टावरपाडा, मौलीगाणपाडा, शेलकुदपाडा, आवलीबारपाडा, नयर्याफरीपाडा, कोतवालपाडा, पाटीलपाडा व नेंदवान खुर्द नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. नदीवर पूल नसल्याने वाहने नदीत टाकून पुढे जावे लागत असल्याने गैरसोयीचे ठरत आहे. पावसाळ्यात नदीच्या पात्रातून प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. यातून अपघातही घडले आहेत. सोमवारी रात्री चारचाकी वाहन या मार्गाने जात असताना चालकाला अंदाज न आल्याने गाळात फसले. यातून पुरामध्ये अडकल्याने वाहन वाहून गेल्याचा प्रकार घडला. यात जीवितहानी झालेली नसली, तरी संबंधित विभाग जीवितहानीची वाट बघत असावा किंवा कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आहे. तसेच प्रशासनाने हा पूल तातडीने बांधून देण्याची मागणीही जोर धरत आहे.