शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ बी याची गुजरात हद्दीतील वाका चार रस्ता ते थेट अक्कलकुवापर्यंत अतिशय दुरवस्था झाली आहे. रत्यावर ...

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ बी याची गुजरात हद्दीतील वाका चार रस्ता ते थेट अक्कलकुवापर्यंत अतिशय दुरवस्था झाली आहे. रत्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. शिवाय रस्त्याच्या साईड पट्ट्यादेखील पूर्णतः खराब झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर चार रस्तापासून हातोडा पुलापर्यंत पूर्णतः उखडला आहे. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असते. परिणामी वाहनचालक, नागरिक अक्षरशः धुळीने माखत असतात. परिणामी त्यांना श्वसनाच्या विकाराचा सामना करावा लागत आहे. साहजिकच रस्त्याच्या शोचनीय अवस्थेमुळे जनता अक्षरशः हैराण झाली आहे. वास्तविक गेल्या वर्षी हा रस्ता दुरुस्तीबाबत बैठक घेतली होती. त्यावेळी आपण आपला प्रतिनिधी पाठवून २१ डिसेंबर २०२०ला काम सुरू करण्याचे सांगितले होते. तरीदेखील आजतागायत काम सुरू करण्यात आलेले नाही. या प्रकरणी आपल्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

या रस्त्यावरून तळोद्याबरोबरच अक्कलकुवा, धडगाव या आदिवासी तालुक्यातील नागरिक मुख्यालयाच्या ठिकाणी कामकाजासाठी जातात. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होण्याची आवश्यकता आहे. संबंधित ठेकेदाराने बेजाबदारपणे अजूनही दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. त्यामुळे त्यास काळ्या यादीत टाकावे. तसा कार्यवाहीचा अहवाल इकडे पाठवावा, अशी सूचना पत्रात उपविभागीय अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. आतापर्यंत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, जनता यांनी केली असल्याचा अनुभव आहे. परंतु ठेकेदाराच्या मनमानीविरोधात चक्क महसूल प्रशासनाने मागणी केल्याने नागरिकांच्या व वाहनधारकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता काय कारवाई करतात की, नेहमीप्रमाणे त्यांच्या पत्रालादेखील केराची टोपली दाखवतात त्याकडे उत्सुकता ताणली गेली आहे.

वाळूच्या वाहनांनाही बंदी घालावी

महसूल प्रशासनाने ज्याप्रमाणे हा रस्ता दुरुस्त न करणाऱ्या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याचे पत्र संबंधित महामार्गाच्या अधिकऱ्यांना दिले आहे. तशीच कारवाई वाळूंच्या वाहनांवर करावी. कारण हे वाहनचालक मनमानीपणे आपली वाहने रस्त्यात उभी करून संपूर्ण वाहतुकीची कोंडी करीत असतात. शिवाय अशा अवजड वाहनांमुळेच रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. आधीच हा रस्ता अरुंद आहे. त्यातच जिल्हा मुख्यालय व दवाखाना अथवा खासगी कामाकरिता येणाऱ्या लोकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच वाळूची वाहने मनमानीपणे रस्ता अडवून ठेवतात. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होत असतो. अनेक वेळा रस्त्याच्या कोंडीमुळे वाहनचालक जायबंदी झाले आहेत, असे असताना ट्रकचालकांवर कारवाई केली जात नाही. एवढेच नव्हे सरकारी कर्मचारी, अधिकारीदेखील या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. त्यांनासुध्दा मोठा त्रास सहन करावा लागत असतो. निदान या वाळूच्या वाहनांवर वचक बसविण्यासाठी सक्त ताकीद द्यावी, अशी जनतेची मागणी आहे.