शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

जिल्ह्यातील ३८ हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मिळण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:34 IST

शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभाराने नाराजी : दुष्काळी योजना राबविण्याबाबतही तत्परता नाही

नंदुरबार : राज्यातील टंचाईग्रस्त भागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असला तरी त्याच्या अंमलबजावणीस विलंब होत असल्याने राज्यभरातील दुष्काळ ग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळालेली नाही. नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल ३८ हजार विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे.दुष्काळी भागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच २०१७-१८ ला घेतला आहे. त्याची अंमलबजावणी दरवर्षी अपेक्षीत आहे. त्याच अनुषंगाने यंदा देखील शासनाने हा निर्णय यापूर्वीच जाहीर केला. असे असतांना प्रत्यक्षात शाळांना अंमलबजावणी बाबतचे पत्र शिक्षण उपसंचालकांनी १४ फेब्रुवारी १९ ला काढला आहे.दुष्काळ जाहीर करण्याची सरकारी प्रथा साधारणत: १ नोव्हेंबर आहे. दरवर्षी ३१ आॅक्टोबरला अंतिम पैसेवारी जाहीर केल्यानंतर ज्या गावाची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी ते गावे दुष्काळी जाहीर होतात. ही बाब लक्षात घेता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा अर्ज साधारणत: याच काळात भरण्यास सुरुवात होते. यावर्षी दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली.बारावीचे अर्ज यापूर्वी २२ ते ३० आॅक्टोबर असा कालावधी होता. तो वाढवून पुठे ६ नोव्हेंबरपर्यंत करण्यात आला. तर दहावीचे अर्ज डिसेंबर महिन्यात भरण्यात आले. जर शासनाचे परीक्षा शुल्क माफीचे धोरण स्पष्ट व यापूर्वीच जाहीर झाल्याने शिक्षण विभागाने जर त्याचवेळी दक्षता दाखविली असती तर आधीच परीक्षा शुल्क न घेता देखील अर्ज भरता आले असते. तांत्रिक अडचणीने ते शक्य झाले नाही असे गृहीत धरल्यास किमान १ नोव्हेंबरला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला जरी शाळांना आदेश देवून कार्यवाही सुरू केली असती तर आतापर्यंत विद्यार्थ्यांना भरलेले परीक्षा शुल्क परत मिळाले असते.परंतु शिक्षण उपसंचालकांनी १४ फेब्रुवारीला आदेश काढले व त्यावर २५ फेब्रुवारीला जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना पत्र पाठवून पात्र विद्यार्थ्यांचा अहवाल पाठविण्याची सुचना केली आहे.शिक्षण विभागाची ही ढिसाळ अंमलबजावणी पहाता विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळण्यास किमान दोन महिने तरी प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे एकुणच पालक व विद्यार्थी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.